शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत ‘सन्मान निधी’चा पहिला हप्ता जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 06:39 IST

नव्या योजनेचा मोदींनी केला शुभारंभ, सर्वांना पैसे मिळण्याची खात्री

गोरखपूर : देशातील १२ कोटी मध्यम व लहान शेतकºयांना वर्षाला प्रत्येकी सहा हजार रुपयांची रोख मदत देण्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘प्राधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे शुभारंभ केला. आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकार वर्षाला ७५ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

पाच एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकºयांना या योजनेचे सहा हजार रुपये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांत दिले जाणार आहेत. येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी या योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद््घाटन केले. मोदींनी एक बटण दाबताच एक कोटी एक हजार लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २,०२१ रुपयांची रक्कम थेट जमा झाली. इतरांचे पैसेही येत्या काही आठवड्यांत जमा होतील, असे मोदींनी सांगितले.

यावेळी ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणेने सुरु केलेल्या भाषणात मोदी यांनी स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेत असतानाच विरोधकांवर व खास करून काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, इतरांप्रमाणे आम्हाला फक्त निवडणुकीपुरता शेतकºयांचा कळवळा नाही. म्हणूनच आम्ही पैशाची तजवीज आधी करून नंतर हीयोजना जाहीर केली. एवढेच नव्हे तर घोषणेनंतर अवघ्या २४ दिवसांत ती सुरुही झाली. याने पोटशूळ उठलेले ‘महाघोटाळे’वाले अपप्रचार करून दिशाभूल करत आहेत. मोदी पैशाचे एक-दोन हप्ते देतील व निवडणूक झाली की हे पैसे बंद करतील, अशा कंड्या पिकविल्या जात आहेत. परंतु हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत व ते कोणीही काढून घेऊ शकणार नाही, याची शेतकºयांनी खात्री बाळगावी, अशी त्यांनी ग्वाही दिली. म्हणूनच मध्ये हात मारण्यासाठी कोणीही दलाल न ठेवता पूर्ण पारदर्शी पद्धतीने हीयोजना राबविण्याची व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

देशभरातील सर्व सरकारांनी संगणकीकृत महसुली रेकॉर्ड अद्ययावत करून लाभार्थींच्या याद्या लवकरात लवकर पाठवाव्या असे आवाहन करून पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार व महाराष्ट्र यासारखया राज्यांनीहे काम तत्परतेने केल्याने ही राज्ये अभिनंदनात पात्र आहेत. परंतु काही राज्य सरकारांची झोप अद्याप उडालेली नाही. त्यांनी लाभार्थींच्या याद्या लगेच केल्या नाहीत तर अन्नदात्या शेतकºयांचे शाप लागून त्यांची पार विधुळवाट होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मोदींनी काही निवडक लाभार्थी शेतकºयांना योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप केले. नंतर त्यांनी त्याच ठिकाणाहून देशाच्या विविध भागांतील शेतकºयांशी व्हिडिओ संवादही साधला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी