शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत ‘सन्मान निधी’चा पहिला हप्ता जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 06:39 IST

नव्या योजनेचा मोदींनी केला शुभारंभ, सर्वांना पैसे मिळण्याची खात्री

गोरखपूर : देशातील १२ कोटी मध्यम व लहान शेतकºयांना वर्षाला प्रत्येकी सहा हजार रुपयांची रोख मदत देण्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘प्राधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे शुभारंभ केला. आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकार वर्षाला ७५ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

पाच एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकºयांना या योजनेचे सहा हजार रुपये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांत दिले जाणार आहेत. येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी या योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद््घाटन केले. मोदींनी एक बटण दाबताच एक कोटी एक हजार लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २,०२१ रुपयांची रक्कम थेट जमा झाली. इतरांचे पैसेही येत्या काही आठवड्यांत जमा होतील, असे मोदींनी सांगितले.

यावेळी ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणेने सुरु केलेल्या भाषणात मोदी यांनी स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेत असतानाच विरोधकांवर व खास करून काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, इतरांप्रमाणे आम्हाला फक्त निवडणुकीपुरता शेतकºयांचा कळवळा नाही. म्हणूनच आम्ही पैशाची तजवीज आधी करून नंतर हीयोजना जाहीर केली. एवढेच नव्हे तर घोषणेनंतर अवघ्या २४ दिवसांत ती सुरुही झाली. याने पोटशूळ उठलेले ‘महाघोटाळे’वाले अपप्रचार करून दिशाभूल करत आहेत. मोदी पैशाचे एक-दोन हप्ते देतील व निवडणूक झाली की हे पैसे बंद करतील, अशा कंड्या पिकविल्या जात आहेत. परंतु हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत व ते कोणीही काढून घेऊ शकणार नाही, याची शेतकºयांनी खात्री बाळगावी, अशी त्यांनी ग्वाही दिली. म्हणूनच मध्ये हात मारण्यासाठी कोणीही दलाल न ठेवता पूर्ण पारदर्शी पद्धतीने हीयोजना राबविण्याची व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

देशभरातील सर्व सरकारांनी संगणकीकृत महसुली रेकॉर्ड अद्ययावत करून लाभार्थींच्या याद्या लवकरात लवकर पाठवाव्या असे आवाहन करून पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार व महाराष्ट्र यासारखया राज्यांनीहे काम तत्परतेने केल्याने ही राज्ये अभिनंदनात पात्र आहेत. परंतु काही राज्य सरकारांची झोप अद्याप उडालेली नाही. त्यांनी लाभार्थींच्या याद्या लगेच केल्या नाहीत तर अन्नदात्या शेतकºयांचे शाप लागून त्यांची पार विधुळवाट होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मोदींनी काही निवडक लाभार्थी शेतकºयांना योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप केले. नंतर त्यांनी त्याच ठिकाणाहून देशाच्या विविध भागांतील शेतकºयांशी व्हिडिओ संवादही साधला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी