शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ना सिक्योरिटी, ना ताफा; रुग्ण बनून सरकारी रुग्णालयात गेल्या IAS; समोर आलं धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 18:24 IST

IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या होत्या. सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांना कोणी ओळखू शकलं नाही.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जेव्हा जिल्ह्यातील महिला एसडीएम (IAS) अचानक तपासणीसाठी आल्या तेव्हा खळबळ उडाली. IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या होत्या. सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांना कोणी ओळखू शकलं नाही. मात्र या IAS असल्याचं समोर आल्यानंतर तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. आरोग्य केंद्रात त्यांना अनेक त्रुटी आढळल्या.

फिरोजाबादच्या IAS कृती राज यांनी मंगळवारी (१२ मार्च) तपासणी करण्यासाठी गुपचूप दीदामई येथील शकीला नईम आरोग्य केंद्र गाठलं. त्या त्यांची कार हॉस्पिटलपासून लांब उभी करून सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे दाखल झाल्या. अशा स्थितीत त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही. फिरोजाबादच्या आरोग्य विभागात अनियमितता, भ्रष्टाचार आणि वाईट वर्तनाच्या तक्रारी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कृती राज यांच्याकडे ही तक्रार येताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि अचानक पाहणी केली. दीदमई प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन दिले जात नसल्याची तक्रार त्यांच्याकडे आली होती. तपासणीसाठी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या तेव्हा गाडीतून खाली उतरताच त्यांनी ओढणीने चेहरा झाकून घेतला आणि सामान्य रुग्णाप्रमाणे लोकांशी चर्चा केली. 

औषधं तपासण्यासाठी त्या आत गेल्या असता एक्सपायरी डेट असलेली अनेक औषधं सापडली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रुग्णांशी असलेली वागणूकही वाईट असल्याचं दिसून आलं. हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचं दिसून आले. याबाबत त्यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

रुग्णालयातील कर्मचारी लोकांना उभं करून इंजेक्शन देत असल्याचं एसडीएम यांनी सांगितलं आहे. बेडवर खूप धूळ साचली होती. स्वच्छता नव्हती. डिलिव्हरी रूम आणि टॉयलेटमध्येही घाण आढळून आली. कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभावचा अभाव होता. सध्या रिपोर्ट कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश