शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Nagaland Killing: सुरक्षा दलांचे अपयश नव्हता नागालँडमधील गोळीबार? धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:12 IST

Nagaland Killing: नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात झालेल्या १४ सामान्य नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना कशी घडली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

कोहिमा - नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात झालेल्या १४ सामान्य नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना कशी घडली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गुप्तहेर खात्याचे अपयश नव्हते. बंडखोर गटाचे लोक कुठे जात आहेत, याबाबत सुरक्षा यंत्रणांना विश्वसनीयरीत्या इनपुट देण्यात आले होते. नागालँडमधील मोन जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशा गोळीबाराच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये सुमारे १४ लोक मारले गेले होते. तर अन्य ११ जण जखमी झाले होते. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार गोळीबाराची ही घटना चुकीच्या ओळखीमुळे झाली असावी. दरम्यान, या घटनेनंतर झालेल्या दंगलीमध्ये एका जवानाचाही मृत्यू झाला आहे. 

सूत्रांनी सांगितले की, दोन एजन्सींकडून गोपनीय माहितीची  तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सेना आणि टास्क फोर्सचा समावेश आहे. मात्र गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, अखेरच्या क्षणी कुणीतरी फुटीरतावाद्यांना माहिती दिली आणि त्यांनी या आंदोलनात स्थानिक लोकांना सामावून घेण्यात यश मिळवले होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार टास्क फोर्सला यामध्ये सामान्य नागरिक सहभागी झाले आहेत याची माहिती नव्हती. एवढेच नाही तर यादरम्यान, अॉपरेशनची तयारी करण्यात आली. मात्र ग्रामस्थांनी बंडखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते मारले गेले, असाही दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, लष्कराने या घटनेच्या कोर्ट अॉफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. तसेच यादरम्यान एक जवान मृत्युमुखी पडला तर इतर काही जवान जखमी झाले. ही घटना आणि त्यानंतर घडलेली घटना  हे सारे काही दुर्दैवी असल्याचे लष्कराने म्हटले आहे. घटनेची उच्च स्तरीय चौकशी सुरू आहे. नागालँडमधील सरकारने आयजीपी नागालँड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

गोळीबाराची ही घटना शनिवारी तेव्हा घडली होती जेव्हा संध्याकाळी काही खाण कामगार पिक अप गाडीमधून गात घरी जात होते. दरम्यान, लष्कराच्या जवानांना एका बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेच्या हालचालींची माहिती मिळाली होती. त्याच गैरसमजातून जवानांनी गोळीबार केला आणि त्यात ही दुर्घटना घडली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत