शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Nagaland Killing: सुरक्षा दलांचे अपयश नव्हता नागालँडमधील गोळीबार? धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:12 IST

Nagaland Killing: नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात झालेल्या १४ सामान्य नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना कशी घडली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

कोहिमा - नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात झालेल्या १४ सामान्य नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना कशी घडली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गुप्तहेर खात्याचे अपयश नव्हते. बंडखोर गटाचे लोक कुठे जात आहेत, याबाबत सुरक्षा यंत्रणांना विश्वसनीयरीत्या इनपुट देण्यात आले होते. नागालँडमधील मोन जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशा गोळीबाराच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये सुमारे १४ लोक मारले गेले होते. तर अन्य ११ जण जखमी झाले होते. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार गोळीबाराची ही घटना चुकीच्या ओळखीमुळे झाली असावी. दरम्यान, या घटनेनंतर झालेल्या दंगलीमध्ये एका जवानाचाही मृत्यू झाला आहे. 

सूत्रांनी सांगितले की, दोन एजन्सींकडून गोपनीय माहितीची  तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सेना आणि टास्क फोर्सचा समावेश आहे. मात्र गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, अखेरच्या क्षणी कुणीतरी फुटीरतावाद्यांना माहिती दिली आणि त्यांनी या आंदोलनात स्थानिक लोकांना सामावून घेण्यात यश मिळवले होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार टास्क फोर्सला यामध्ये सामान्य नागरिक सहभागी झाले आहेत याची माहिती नव्हती. एवढेच नाही तर यादरम्यान, अॉपरेशनची तयारी करण्यात आली. मात्र ग्रामस्थांनी बंडखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते मारले गेले, असाही दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, लष्कराने या घटनेच्या कोर्ट अॉफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. तसेच यादरम्यान एक जवान मृत्युमुखी पडला तर इतर काही जवान जखमी झाले. ही घटना आणि त्यानंतर घडलेली घटना  हे सारे काही दुर्दैवी असल्याचे लष्कराने म्हटले आहे. घटनेची उच्च स्तरीय चौकशी सुरू आहे. नागालँडमधील सरकारने आयजीपी नागालँड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

गोळीबाराची ही घटना शनिवारी तेव्हा घडली होती जेव्हा संध्याकाळी काही खाण कामगार पिक अप गाडीमधून गात घरी जात होते. दरम्यान, लष्कराच्या जवानांना एका बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेच्या हालचालींची माहिती मिळाली होती. त्याच गैरसमजातून जवानांनी गोळीबार केला आणि त्यात ही दुर्घटना घडली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत