शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर; तपास दिला सीबीआयकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 06:04 IST

या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेले नाही.

भुवनेश्वर : निष्काळजीपणाने जीवाला धोका निर्माण करणे व मृत्यूला कारणीभूत ठरणे असे आरोप ठेवून ओडिशातील भीषण रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जाणार आहे. 

बालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेले नाही. सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी रेल्वे खात्याने केली होती. गाड्या कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहिती देणाऱ्या इंटरलॉकिंग यंत्रणेत छेडछाड केली असावी, असा संशय रेल्वेने व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)

...म्हणून तपास दिला सीबीआयकडे 

रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी कोणीतरी छेडछाड केली असावी. त्यामुळेच ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात घडला, असा प्राथमिक तपासाचा निष्कर्ष आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले. सीबीआयचे पथक अपघातस्थळी मंगळवारी जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातCBIगुन्हा अन्वेषण विभागCBIसीबीआयCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषणIndian Railwayभारतीय रेल्वे