शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या खांद्यापर्यंत आलंय पुराचं पाणी, फिर भी दिल है हिंदुस्तानी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 12:18 IST

भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते.

ठळक मुद्देया अंगणवाडी सेविकांच्या खांद्यापर्यंत पावसामुळे पुराचे पाणी आलंय. त्यांची शाळाही पावसाच्या पाण्यातच तरलेली दिसतेय. मात्र, या परिस्थितही या महिलांनी तिरंग्याला सलामी दिली.

पाटणा - देशात शनिवारी 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर कोरोनाचं सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने देशभरात आणि विदेशात असलेल्या नागरिकांनी परदेशात तिरंगा फडकवला. नेटीझन्सनेही सोशल मीडियातून देशभक्ती व देशप्रेमाच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, दुर्गम भागातील नागरिकांची तीव्र इच्छाशक्ती पाहून, लाख असतील अडचणी तरीही आम्ही तत्पर सदैव तिरंग्यासाठी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बिहारमधील पूर दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांनी असाच स्वातंत्र्य दिन साजरा करुन देशभक्तीचं उदाहरण दिलंय. 

भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. बिहारमध्ये सध्या कोरोना महामारीसोबत पावसाळ्यातील पुराचे संकट आहे. विशेषत: दरभंगा येथील परिस्थिती अतिशय हालाखीची बनली आहे. मात्र, तरीही येथील अंगणवाडीसेविकांनी देशभक्तीचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय. या महिलांच्या खांद्यापर्यंत आलंय पुराचं पाणी, फिर भी दिल है हिंदुस्तानी... हेच त्यांनी दाखवून दिलंय.

या अंगणवाडी सेविकांच्या खांद्यापर्यंत पावसामुळे पुराचे पाणी आलंय. त्यांची शाळाही पावसाच्या पाण्यातच तरलेली दिसतेय. मात्र, या परिस्थितही या महिलांनी तिरंग्याला सलामी दिली. तर, येथील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी नावेत (बोट) उभारून ध्वजारोहन केलं. संकटाच्या काळातील या ध्वजारोहनावेळी वंदे मातरमच्या घोषणाही देण्यात आल्या. या नागरिकांच्या देशभक्तीने देशासाठी कायपण... हेच दाखवून दिलंय. 

दरभंगा जिल्ह्यातील बिरौल मंडल मुख्यालयात अंगणवाडीसेविकांनी पुराच्या पाण्यात उतरुन ध्वजारोहन केले. ज्यांनी या महिलांचा ध्वजारोहन समारंभ पाहिला, प्रत्येकाने तिरंग्यासोबत या महिलांच्या देशभक्तीलाही सॅल्यूट केला. सोशल मीडियावरही या महिलांनी तिरंग्याला दिलेल्या सलामीचे फोटो व्हायरल झाले आहेत.  

टॅग्स :IndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिनBiharबिहारfloodपूर