शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:37 IST

बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे.

आसाम - बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. आज नाही तर उद्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे उघड होईलच मात्र यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी लावला. 

बीएसएफच्या बॉर्डर प्रोजेक्टचे उद्धाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आसाम येथे गेले होते, त्यानंतर जनसमुदायला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली. आज नाही तर उद्या भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी समोर येईलच. पाकिस्तान आणि त्यांचे नेते यांना माहिती आहे किती दहशतवादी मारले गेलेत. त्याचसोबत नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाईजेशन (एऩटीआरओ) च्या सिस्टमने ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला त्या हल्ल्याच्या ठिकाणी 300 मोबाईल फोन नेटवर्क अँक्टीव असल्याची खात्री केली असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. 

मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. यावर राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत आपले हवाई दल त्याठिकाणी जाऊन किती दहशतवादी मारले याची संख्या मोजत बसेल काय ? हा खेळ मांडला आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला. एनटीआरओ ही एक प्रामाणिक संस्था आहे,त्यांचे म्हणणे आहे की ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा त्याठिकाणी 300 मोबाईल नेटवर्क सुरू असल्याची माहिती मिळाली. हे मोबाईल फोन कोणत्या झाडाला लावले होते का ? की एनटीआरओवरही तुमचा विश्वास नाही अशी टीका केली

सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करू नका, तर देश निर्माण करण्यासाठी, देशाच्या विकासाचे राजकारण करा. काँग्रेसच्या माझ्या सहकारी मित्रांना एवढचं वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं आणि आपल्या हवाई दलाने किती दहशतवादी मारले याची संख्या मोजावी असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.   

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसairforceहवाईदलsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक