शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:37 IST

बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे.

आसाम - बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. आज नाही तर उद्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे उघड होईलच मात्र यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी लावला. 

बीएसएफच्या बॉर्डर प्रोजेक्टचे उद्धाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आसाम येथे गेले होते, त्यानंतर जनसमुदायला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली. आज नाही तर उद्या भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी समोर येईलच. पाकिस्तान आणि त्यांचे नेते यांना माहिती आहे किती दहशतवादी मारले गेलेत. त्याचसोबत नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाईजेशन (एऩटीआरओ) च्या सिस्टमने ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला त्या हल्ल्याच्या ठिकाणी 300 मोबाईल फोन नेटवर्क अँक्टीव असल्याची खात्री केली असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. 

मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. यावर राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत आपले हवाई दल त्याठिकाणी जाऊन किती दहशतवादी मारले याची संख्या मोजत बसेल काय ? हा खेळ मांडला आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला. एनटीआरओ ही एक प्रामाणिक संस्था आहे,त्यांचे म्हणणे आहे की ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा त्याठिकाणी 300 मोबाईल नेटवर्क सुरू असल्याची माहिती मिळाली. हे मोबाईल फोन कोणत्या झाडाला लावले होते का ? की एनटीआरओवरही तुमचा विश्वास नाही अशी टीका केली

सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करू नका, तर देश निर्माण करण्यासाठी, देशाच्या विकासाचे राजकारण करा. काँग्रेसच्या माझ्या सहकारी मित्रांना एवढचं वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं आणि आपल्या हवाई दलाने किती दहशतवादी मारले याची संख्या मोजावी असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.   

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसairforceहवाईदलsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक