शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

'मित्रां'साठी कायपण! बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 11:59 IST

आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांना अर्थसंकल्पात मोठी भेट मिळाली असून केंद्र सरकार मोठा निधी देणार आहे.

Union Budget 2024 : देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना मोदी सरकारने रिटर्फ गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशसाठी मोठ्या निधीची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बिहारमध्ये मोठ्या मेडिकल कॉलेजची घोषणा केली आहे. त्यामुळे बिहारची विशेष राज्याची मागणी आणि टीडीपीने केलेली लोकसभा अध्यक्षपदाच्या ऐवजी त्यांच्या राज्यांवर केंद्राकडून पैशांचा पाऊस पाडण्यात आलाय.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठी भेट दिली आहे. अशा प्रकारे त्यांनी मित्रपक्षांनाही खूष ठेवण्याचे काम केले आहे. र्थमंत्र्यांनी बिहारसाठी नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची ही मोठी मागणी मान्य केली आहे. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला विशेष पॅकेजची भेट मिळाली आहे. पुनर्रचनेच्या वेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये बिहारला मोठी भेट दिली आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी २६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. याशिवाय बक्सर-भागलपूर द्रुतगती मार्गाचीही घोषणा करण्यात आली.  बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली जातील. त्याचबरोबर नवीन विमानतळही बांधण्यात येणार आहे.

१० वर्षात पहिल्यांदाच आंध्र प्रदेशवर लक्ष

१० वर्षांत प्रथमच आंध्र प्रदेशला अर्थसंकल्पात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पूर्वेकडील काही राज्यांपैक सरकारचे विशेष लक्ष आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात अर्थमंत्र्यांनी राज्याच्या भांडवलाची गरज मान्य केली आहे. आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावती शहराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात १५,००० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ही घोषणा आंध्र प्रदेशसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे राज्यातील विकासाचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. अमरावतीला आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे.

पूर्वोदय योजनेची घोषणा

यासोबत निर्मला सीतारमन यांनी देशाच्या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजनेची घोषणा केली. केंद्राने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या विकासासाठी पूर्वोदय योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. या योजनेत अमृतसर-कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत गया येथे एक औद्योगिक केंद्र बांधले जाईल. सांस्कृतिक केंद्रे आधुनिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित केली जातील. या मॉडेलचे नाव विकास भी विरासत भी असं असणार आहे.

याशिवाय बिहारमध्ये रस्त्यांचे जाळे वाढवण्यात येणार आहे. याअंतर्गत पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर भागलपूर द्रुतगती मार्ग, बोधगया-राजगीर वैशाली दरभंगा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहेत. याशिवाय बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन पदरी पूलही बांधण्यात येणार आहे. यासाठी २६००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पीरपेंटी येथे २१४०० कोटी रुपये खर्चून २४०० मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लांट बांधण्यात येणार आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBiharबिहारAndhra Pradeshआंध्र प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी