शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चीनच्या सीमेजवळ लढाऊ विमाने होणार तैनात; न्योमा एअरफिल्ड होणार अपग्रेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 08:58 IST

नवी एअरफिल्ड आणि लष्करी सुविधांच्या निर्मितीचे काम सीमा रस्ते संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारतानेही प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सीमेजवळच्या एअरफिल्ड्स अपग्रेड करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळ असलेल्या न्योमा अॅडव्हान्स लैंडिंग ग्राउंड (एएलजी) अपग्रेड करण्याच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे काम पूर्ण झाल्यानंतर चीनच्या कोणत्याही हालचालींना तातडीने प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे. नवी एअरफिल्ड आणि लष्करी सुविधांच्या निर्मितीचे काम सीमा रस्ते संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.

न्योमा एअरफिल्डचे महत्त्वगलवान संघर्षानंतर वाढलेल्या तणावादरम्यान सैनिक आणि इतर लष्करी साहित्य सीमेजवळ लवकर नेण्यासाठी न्योमा एअरफिल्डचा वापर करण्यात आला होता. येथे चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स आणि सी- १३०जे ही विमानेदेखील उतरविण्यात आली होती. चीनच्या सीमेपासून ही एअरफिल्ड केवळ ५० किलोमीटर अंतरावर आहे.

हवाई दलाची क्षमता वाढणार- सरकारकडून एअरफिल्डच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. आता तातडीने लढाऊ विमानांच्या तैनातीसाठी अपग्रेड करण्याचे काम सुरु होणार आहे.- लढाऊ विमानांचे संचलन येथून सुरु झाल्यास हवाई दलाचे सामर्थ्यात वाढणार आहे. शत्रूने कोणतेही वाकडे पाऊल टाकल्यास तत्काळ प्रत्युत्तर देता येईल. 

भारत-अमेरिकेचा चीनलगत युद्धसरावभारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला लागून असलेल्या सीमाभागात भारत व अमेरिकेचे लष्कर संयुक्त युद्धसराव करणार आहे. दोन्ही देशांचे लष्कर १५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उत्तराखंडमधील औली भागात हा युद्धसराव करणार आहे. हा प्रदेश प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १०० किमी दूर अंतरावर आहे. एकूण सातशे सैनिक त्यात सहभागी होतील.

टॅग्स :fighter jetलढाऊ विमानchinaचीनIndiaभारतindia china faceoffभारत-चीन तणाव