शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

"दिवसा भाजपाशी भांडतात, रात्री योगी-मोदींना भेटतात"; ओमप्रकाश राजभर यांचा सपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:55 IST

समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना राजभर म्हणाले की, "सपाला मत देणार्‍या 18 टक्के मुस्लिमांनाही हे समजले आहे की, त्यांनी द्वेषाशिवाय काहीही दिलं नाही."

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख ओमप्रकाश राजभर हे योगी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल असा सातत्याने दावा करत आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा तारखाही दिल्या आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर ओमप्रकाश राजभर नक्कीच मंत्री होतील, असं त्यांनी काल पुन्हा एकदा सांगितलं.

कल्की महोत्सवात सहभागी होण्यासाठी राजभर रविवारी संभल येथे पोहोचले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री बनण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला आणि हिंदू देवतांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनाही लक्ष्य केलं. स्वामी प्रसाद मौर्य यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार ते बोलत आहेत. मतांसाठी हे सर्वकाही करत आहे असं राजभर यांनी म्हटलं. 

समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना राजभर म्हणाले की, सपाला मत देणार्‍या 18 टक्के मुस्लिमांनाही हे समजले आहे की, त्यांनी द्वेषाशिवाय काहीही दिलं नाही. यूपीमध्ये चार वेळा सपाचे सरकार होते आणि अखिलेश यादव पाच वर्षे मुख्यमंत्री होते. आता जर आपण राजकीय सहभागाबद्दल किंवा नोकऱ्यांमधील वाटा याविषयी बोललो तर संभल जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तुलना केली तर तुम्हाला 8 टक्के यादव दिसतील पण तुम्हाला 18 टक्के मतदान करणारे मुस्लिम सापडणार नाहीत.

ओमप्रकाश राजभर इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, "आता जी आघाडी झाली आहे, त्यात नितीश, जयंत आणि अखिलेश यादव यांचे वेगवेगळे सूर आहेत, मग या परिस्थितीत प्रगती कशी होईल. सपा दिवसा भारतीय जनता पक्षाविरोधात बोलते आणि रात्री मोदी-योगींना पुष्पगुच्छ देऊन भेटते." 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवPoliticsराजकारण