शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

"दिवसा भाजपाशी भांडतात, रात्री योगी-मोदींना भेटतात"; ओमप्रकाश राजभर यांचा सपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:55 IST

समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना राजभर म्हणाले की, "सपाला मत देणार्‍या 18 टक्के मुस्लिमांनाही हे समजले आहे की, त्यांनी द्वेषाशिवाय काहीही दिलं नाही."

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख ओमप्रकाश राजभर हे योगी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल असा सातत्याने दावा करत आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा तारखाही दिल्या आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर ओमप्रकाश राजभर नक्कीच मंत्री होतील, असं त्यांनी काल पुन्हा एकदा सांगितलं.

कल्की महोत्सवात सहभागी होण्यासाठी राजभर रविवारी संभल येथे पोहोचले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री बनण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला आणि हिंदू देवतांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनाही लक्ष्य केलं. स्वामी प्रसाद मौर्य यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार ते बोलत आहेत. मतांसाठी हे सर्वकाही करत आहे असं राजभर यांनी म्हटलं. 

समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना राजभर म्हणाले की, सपाला मत देणार्‍या 18 टक्के मुस्लिमांनाही हे समजले आहे की, त्यांनी द्वेषाशिवाय काहीही दिलं नाही. यूपीमध्ये चार वेळा सपाचे सरकार होते आणि अखिलेश यादव पाच वर्षे मुख्यमंत्री होते. आता जर आपण राजकीय सहभागाबद्दल किंवा नोकऱ्यांमधील वाटा याविषयी बोललो तर संभल जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तुलना केली तर तुम्हाला 8 टक्के यादव दिसतील पण तुम्हाला 18 टक्के मतदान करणारे मुस्लिम सापडणार नाहीत.

ओमप्रकाश राजभर इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, "आता जी आघाडी झाली आहे, त्यात नितीश, जयंत आणि अखिलेश यादव यांचे वेगवेगळे सूर आहेत, मग या परिस्थितीत प्रगती कशी होईल. सपा दिवसा भारतीय जनता पक्षाविरोधात बोलते आणि रात्री मोदी-योगींना पुष्पगुच्छ देऊन भेटते." 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवPoliticsराजकारण