जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!
By Admin | Updated: March 14, 2016 00:13 IST2016-03-14T00:13:44+5:302016-03-14T00:13:44+5:30
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!
class="web-title summary-content">Web Title: Fight against the government to get the land!