शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहणार, २०४७ पर्यंत बलशाली भारताची उभारणी: PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 06:15 IST

१४० कोटी देशवासीयांना ‘माझे कुटुंबीय’ असे संबोधत आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सलग दहाव्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकसित देशाच्या निर्माणाचा वज्रनिर्धार व्यक्त केला. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून द्यायची असून त्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालन या तीन वाईट प्रवृत्तींमुळे देशाचा विकास खोळंबला होता, असा दावाही मोदी यांनी केला. 

१४० कोटी देशवासीयांना ‘माझे कुटुंबीय’ असे संबोधत आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशवासीयांमध्ये एक मजबूत राष्ट्रनिर्मितीची पूरेपूर क्षमता असून केवळ भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण आणि लांगूलचालन हे या मार्गावरील मुख्य अडथळे होते. गेल्या ७५ वर्षांत काही विकृती समाजात निर्माण झाल्या असून त्यांचा समूळ नायनाट करणे हे आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

मणिपूरमध्ये शांततेचे पुनरागमन

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने तेथील परिस्थिती आता पूर्ववत होत असून केवळ शांततेच्या माध्यमातूनच मणिपूरचा विकास साधता येईल, असे पंतप्रधान म्हणाले.

मोदीमंत्र...

- अमृतकाळ हा कर्तव्यकाळ आहे. म्हणजेच आज घेतलेल्या निर्णयाची फळे येत्या एक हजार वर्षांपर्यंत चाखता येतील.- २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर त्यासाठी आजच निर्धार करून पुढील पाच वर्षे त्या दिशेने वाटचाल करावी.- भारताची भौगोलिक स्थिती आणि वैविध्यातील एकता हे महत्त्वाचे दुवे असून त्यांची परस्परांत सांगड घालणे इष्ट ठरेल.- राष्ट्र सर्वोपरि, ही वृत्ती बळावणे गरजेचे असून सरकारकडे कररूपातून जमा झालेला पै अन् पै देशवासीयांच्या कल्याणासाठी वापरला जाईल, याची दक्षता बाळगावी लागेल.- जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश, घरांसाठी सुलभ कर्जे आणि २५ हजार जनऔषधी केंद्रांची उभारणी यांची हमी.- महिला सक्षमीकरणावर भर देत दोन कोटी लखपती दीदी देशात निर्माण होतील, त्या दिशेने सरकार प्रयत्न करणार.

देशवासीयांचे मानले आभार

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासीयांचे आभार मानले. देशापुढील समस्यांचे मूळ देशवासीयांनी शोधले आणि ३० वर्षांनंतर प्रथमच २०१४ मध्ये देशाला एक मजबूत आणि स्थिर सरकार मिळाले. सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करत २०१९ मध्ये पुन्हा निवडून दिले. त्यासाठी देशवासीयांचा आभारी असल्याचे स्पष्ट करत मोदींनी आता पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी देशवासीय देतील, अशी खात्री व्यक्त केली.

स्वप्ने अनेक आहेत. संकल्प आणि धोरणे स्पष्ट आहेत. आमच्या मनोवृत्तीसमोर प्रश्नचिन्हांची माळ नाही. मात्र, असे असले तरी आपल्याला काही कटु वस्तुस्थितींचा स्वीकार करत वाईट प्रवृत्तींवर मात करावी लागेल. २०४७ मध्ये जेव्हा देश १०० वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करत असेल तेव्हा एक मजबूत आणि विकसित राष्ट्र म्हणून भारताची जगात ओळख निर्माण झाली असेल. त्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार करूया. त्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करू या. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी