शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्याने पाचवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 12:25 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.हा मुलगा शाहपूर भागातील सेंट अँथनी स्कूलचा विद्यार्थी होता.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. नवनीत प्रकाश असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाहपूर भागातील सेंट अँथनी स्कूलचा विद्यार्थी असलेल्या नवनीतला त्याच्या वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्यामुळे त्याने घरी विष पिऊन आत्महत्या केली. नवनीतचे वडील रवी प्रकाश यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत ही बाब नमूद केली आहे. नवनीतला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तेथे त्याचा मृत्यू झाला.

नवनीतच्या दप्तरात सापडलेल्या एका चिठ्ठीतून त्याच्या आत्महत्येमागील कारण समोर आलं आहे. माझ्या शिक्षिकेने मला वर्गात तीन तास उभं राहायला सांगितलं. तसंच कोंबडा बनून उभं केलं होतं, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. मी आता मरायचं ठरवलं आहे. मॅडमने आणखी कुठल्या विद्यार्थ्यांला अशी शिक्षा देऊ नये, अशी माझी शेवटची इच्छा आहे’, असंही त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्याने निराश झालेल्या मुलाने 15 सप्टेंबर रोजी विष प्यायलं होतं. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला होता. तसंच शिक्षिकेला अटक करण्याची मागणीही केली. दरम्यान रवी प्रकाश यांच्या तक्रारीवरून वर्गशिक्षिका भावना जोसेफ आणि शाळा व्यवस्थापन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

माझ्या मुलाबरोबर जे झालं तसं इतर मुलांबरोबर होऊ नये, यासाठी याप्रकरणी कठोर कारवाई व्हायला हवी, माझ्या मुलाने सुसाइड नोटमध्ये असं कोणाबरोबर होऊ नये यासाठी कारवाईची मागणी केली आहे, त्याची पूर्तता व्हावी, अशी प्रतिक्रिया नवनीतच्या वडिलांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. या चिमुरड्याच्या हत्येनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी