शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्याने पाचवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 12:25 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.हा मुलगा शाहपूर भागातील सेंट अँथनी स्कूलचा विद्यार्थी होता.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. नवनीत प्रकाश असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाहपूर भागातील सेंट अँथनी स्कूलचा विद्यार्थी असलेल्या नवनीतला त्याच्या वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्यामुळे त्याने घरी विष पिऊन आत्महत्या केली. नवनीतचे वडील रवी प्रकाश यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत ही बाब नमूद केली आहे. नवनीतला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तेथे त्याचा मृत्यू झाला.

नवनीतच्या दप्तरात सापडलेल्या एका चिठ्ठीतून त्याच्या आत्महत्येमागील कारण समोर आलं आहे. माझ्या शिक्षिकेने मला वर्गात तीन तास उभं राहायला सांगितलं. तसंच कोंबडा बनून उभं केलं होतं, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. मी आता मरायचं ठरवलं आहे. मॅडमने आणखी कुठल्या विद्यार्थ्यांला अशी शिक्षा देऊ नये, अशी माझी शेवटची इच्छा आहे’, असंही त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्याने निराश झालेल्या मुलाने 15 सप्टेंबर रोजी विष प्यायलं होतं. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला होता. तसंच शिक्षिकेला अटक करण्याची मागणीही केली. दरम्यान रवी प्रकाश यांच्या तक्रारीवरून वर्गशिक्षिका भावना जोसेफ आणि शाळा व्यवस्थापन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

माझ्या मुलाबरोबर जे झालं तसं इतर मुलांबरोबर होऊ नये, यासाठी याप्रकरणी कठोर कारवाई व्हायला हवी, माझ्या मुलाने सुसाइड नोटमध्ये असं कोणाबरोबर होऊ नये यासाठी कारवाईची मागणी केली आहे, त्याची पूर्तता व्हावी, अशी प्रतिक्रिया नवनीतच्या वडिलांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. या चिमुरड्याच्या हत्येनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी