शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्याने पाचवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 12:25 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.हा मुलगा शाहपूर भागातील सेंट अँथनी स्कूलचा विद्यार्थी होता.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. नवनीत प्रकाश असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाहपूर भागातील सेंट अँथनी स्कूलचा विद्यार्थी असलेल्या नवनीतला त्याच्या वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्यामुळे त्याने घरी विष पिऊन आत्महत्या केली. नवनीतचे वडील रवी प्रकाश यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत ही बाब नमूद केली आहे. नवनीतला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तेथे त्याचा मृत्यू झाला.

नवनीतच्या दप्तरात सापडलेल्या एका चिठ्ठीतून त्याच्या आत्महत्येमागील कारण समोर आलं आहे. माझ्या शिक्षिकेने मला वर्गात तीन तास उभं राहायला सांगितलं. तसंच कोंबडा बनून उभं केलं होतं, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. मी आता मरायचं ठरवलं आहे. मॅडमने आणखी कुठल्या विद्यार्थ्यांला अशी शिक्षा देऊ नये, अशी माझी शेवटची इच्छा आहे’, असंही त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्याने निराश झालेल्या मुलाने 15 सप्टेंबर रोजी विष प्यायलं होतं. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला होता. तसंच शिक्षिकेला अटक करण्याची मागणीही केली. दरम्यान रवी प्रकाश यांच्या तक्रारीवरून वर्गशिक्षिका भावना जोसेफ आणि शाळा व्यवस्थापन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

माझ्या मुलाबरोबर जे झालं तसं इतर मुलांबरोबर होऊ नये, यासाठी याप्रकरणी कठोर कारवाई व्हायला हवी, माझ्या मुलाने सुसाइड नोटमध्ये असं कोणाबरोबर होऊ नये यासाठी कारवाईची मागणी केली आहे, त्याची पूर्तता व्हावी, अशी प्रतिक्रिया नवनीतच्या वडिलांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. या चिमुरड्याच्या हत्येनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी