विषबाधा होऊन पंधरा जनावरे दगावली धोत्रे गावातील घटना : चार लाख पन्नास हजारांचे नुकसान
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:03+5:302016-01-03T00:05:03+5:30
कुसळंब : जनावरांना पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने पंधरा जनावरे दगावली़ यात दोन जनावरे जखमी झाली असून, साधारणत: चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 2 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास धोत्रे (ता़ बार्शी) येथे घडली़

विषबाधा होऊन पंधरा जनावरे दगावली धोत्रे गावातील घटना : चार लाख पन्नास हजारांचे नुकसान
क सळंब : जनावरांना पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने पंधरा जनावरे दगावली़ यात दोन जनावरे जखमी झाली असून, साधारणत: चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 2 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास धोत्रे (ता़ बार्शी) येथे घडली़दत्तात्रय विठोबा जाधवर यांच्या शेतात जनावरांना पिण्यासाठी बांधलेल्या हौदात अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल़े यावेळी अशोक माधव पवार यांची जनावरे दुपारी एकच्या सुमारास पाणी दाखविण्यासाठी हौदावर आणले होत़े यावेळी दत्तात्रय जाधवर व अशोक पवार या दोघांची जनावरे पाणी पिली़ त्यानंतर अध्र्या तासाने जनावरे थरथर कापू लागली व तोंडातून फेस येऊ लागला़ या घटनेमुळे अशोक पवार यांनी पांगरी पशुवैद्यकीय अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला़ या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी घटनास्थळावर पोहोचेपर्यंत 13 जनावरे दगावली होती़ यात दत्तात्रय जाधवर यांच्या दोन म्हैशी, एक बैल, चार गाई, दोन रेड्या मृत्युमुखी पडल्या़ एक बैल वाचविण्यात पांगरी वैद्यकीय अधिकार्यास यश आले आह़े तर अशोक पवार यांच्या दोन जर्सी गाई, दोन बैल असे दोघांचे मिळून अंदाजे 4 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल़े याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ बदोले हे करीत आहेत़