शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत, सबसिडीचे पॅकेज मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 06:34 IST

या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला. 

नवी दिल्ली : डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किरकोळ किमती प्रति ५० किलोच्या १३५० रुपये इतका कायम ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ या तारखेनंतरही अतिरिक्त अनुदान देण्याचा कालावधी केंद्र सरकारने वाढविला आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला.  गेल्यावर्षी केंद्र सरकारने १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीपर्यंत प्रतिटन ३५०० दराने डीएपी खतासाठी मर्यादित स्वरूपातील विशेष अनुदान पॅकेज जाहीर केले होते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर २६२५ कोटी रुपयांचा बोजा पडला होता. हे अनुदान केंद्र सरकारच्या विद्यमान न्यूट्रिएंट बेस्ड् सबसिडी (एनबीसी) योजनेशिवाय अतिरिक्त स्वरूपात देण्यात आले होते. डीएपी खतासाठी पूर्वी मंजूर विशेष अनुदानाचा कालावधी १ जानेवारी २०२५पासून पुढील आदेश मिळेपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. याबाबत केंद्र सरकारने सांगितले की, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डीएपी खत उपलब्ध व्हावे हा या निर्णयामागे विचार आहे. 

शेतकरी हिताचे संरक्षण करण्यावर भरकेंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना डीएपी खत १३५० रुपये प्रतिबॅग या दराने यापुढे मिळत राहील. अतिरिक्त भार केंद्र सरकार उचलणार आहे. वैष्णव यांनी म्हटले की, जागतिक बाजारपेठेतील डीएपी खताच्या किमतींमध्ये भूराजकीय परिस्थितीमुळे अस्थिरता आहे; पण सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारने २८ प्रकारची फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवरही सबसिडी दिली आहे. ही सबसिडी १ एप्रिल २०१०पासून लागू असलेल्या एनबीएस योजनेद्वारे देण्यात येते. 

दोन पीकविमा योजनांना मुदतवाढप्रधानमंत्री पीकविमा योजना (पीएमएफबीवाय) आणि आरडब्ल्यूबीसीआयएस या दोन पीकविमा योजनांची मुदत केंद्र सरकारने आणखी एक वर्षाने वाढविली आहे. त्यामुळे ही योजना आता २०२५-२६ या वर्षापर्यंत अंमलात असणार आहे.

या योजनांच्या अंमलबजावणीकरिता तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ८२४.७७ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत (सीसीइए) हा निर्णय घेण्यात आला.

२०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीपर्यंत पीएमएफबीवाय आणि आरडब्ल्यूबीसीआयएस या योजनांचा निधी ६९,५१५.७१ कोटी रुपये आहे. २०२०-२०२१ ते २०२४-२५ या कालावधीत हा निधी ६६५५० कोटी रुपये होता. 

२००४ ते २०१४पेक्षा सबसिडीचे दुप्पट प्रमाण२०१४ ते २०२४ या दशकात मोदी सरकारने खतांसाठी ११.९ लाख कोटींची रुपयांची सबसिडी दिली आहे. ही रक्कम २००४ ते २०१४ या कालावधीतील याच प्रकारच्या ५.५ लाख कोटी रुपयांच्या सबसिडीपेक्षा दुप्पट आहे. शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी परवडणाऱ्या दरात डीएपी खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

नव्या वर्षातील पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी : पंतप्रधान नरेंद्र मोदी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की,  केंद्र सरकारचा नव्या वर्षातील पहिला निर्णय हा शेतकऱ्यांना समर्पित आहे.- केंद्रीय मंत्रिमंडळाने पीकविमा योजनेला मुदतवाढ दिली असून, डीएपी खताच्या सबसिडीत वाढ केली.- त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खत मिळणार आहे. डीएपीवरील एक वेळचे विशेष पॅकेज एनबीएस सबसिडीच्या प्रतिटन ३५०० रुपयांपेक्षा अधिक वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी