शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

दिल्ली पोलिसांच्या अ‍ॅक्शनची भीती; रात्रभर बॉर्डरवर जागे राहिले शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 08:45 IST

Farmer Protest : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. 

नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱी आंदोलनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गाझीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती बनली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. रात्री पोलिसांनी शेतकऱ्यांच्या कॅम्पची वीज तोडली. शेतकऱ्यांनी पोलीस आणि सरकारवर आंदोलन अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. 

टिकैत यांनी सांगितले की, प्रशासनाने आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. लाईट बंद केली. भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यामुळे आम्ही रात्रभर जागे राहिलो आहोत. प्रशासनाला आमचे आंदोलन संपवायचे आहे. जेव्हा दिल्ली पोलीस दाखल केलेल्या गुन्ह्यांवर चौकशीला बोलवेल तेव्हा आम्ही त्यांना सामोरे जाऊ. काही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्यावर टिकैत यांनी सांगितले की, गाझीपूर बॉर्डरवर वीज कापताच ते लोक गायब झाले. 

आमचे आंदोलन सुरुच राहिल. लाल किल्ल्यावर जे काही झाले, ज्याने ते केले त्याच्याविरोधात कारवाई व्हावी. जे काही घडले आणि ज्याने घडविले त्याच्यासोबत आम्ही नाही आहोत. ट्रॅक्टर रॅलीचा जो मार्ग दिला होता, त्यावरून पोलिसांनी जाऊ दिले नाही. आम्ही काही चुकीचे केले नाही. दांड्यामध्येच झेंडा अडकवता येतो, त्यामध्ये चुकीचे काय. आंदोलन संपविण्याची सरकारची ही चाल आहे. शेतकरी नेता भीम सिंह यांनी आंदोलन सोडणे हा एक दुर्भाग्यपूर्ण निर्णय आहे. 

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप