शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

दिल्ली पोलिसांच्या अ‍ॅक्शनची भीती; रात्रभर बॉर्डरवर जागे राहिले शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 08:45 IST

Farmer Protest : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. 

नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱी आंदोलनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गाझीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती बनली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. रात्री पोलिसांनी शेतकऱ्यांच्या कॅम्पची वीज तोडली. शेतकऱ्यांनी पोलीस आणि सरकारवर आंदोलन अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. 

टिकैत यांनी सांगितले की, प्रशासनाने आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. लाईट बंद केली. भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यामुळे आम्ही रात्रभर जागे राहिलो आहोत. प्रशासनाला आमचे आंदोलन संपवायचे आहे. जेव्हा दिल्ली पोलीस दाखल केलेल्या गुन्ह्यांवर चौकशीला बोलवेल तेव्हा आम्ही त्यांना सामोरे जाऊ. काही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्यावर टिकैत यांनी सांगितले की, गाझीपूर बॉर्डरवर वीज कापताच ते लोक गायब झाले. 

आमचे आंदोलन सुरुच राहिल. लाल किल्ल्यावर जे काही झाले, ज्याने ते केले त्याच्याविरोधात कारवाई व्हावी. जे काही घडले आणि ज्याने घडविले त्याच्यासोबत आम्ही नाही आहोत. ट्रॅक्टर रॅलीचा जो मार्ग दिला होता, त्यावरून पोलिसांनी जाऊ दिले नाही. आम्ही काही चुकीचे केले नाही. दांड्यामध्येच झेंडा अडकवता येतो, त्यामध्ये चुकीचे काय. आंदोलन संपविण्याची सरकारची ही चाल आहे. शेतकरी नेता भीम सिंह यांनी आंदोलन सोडणे हा एक दुर्भाग्यपूर्ण निर्णय आहे. 

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप