शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धक्कादायक! 16 वर्षीय नवरी, 52 वर्षांचा नवरा; कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी लावलं लेकीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 11:52 IST

एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचे एका मोठ्या वयाच्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं. मुलीला लग्न करायचं नव्हतं. पण तरीही वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं.

बिहारमधील भागलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचे एका मोठ्या वयाच्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं. मुलीला लग्न करायचं नव्हतं. पण तरीही वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं, त्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून स्वत:साठी न्याय मागितला. मला शिक्षण घ्यायचं आहे, मला न्याय मिळवून द्या, नाहीतर मी मरेन असं 16 वर्षीय मुलीने सांगितलं आहे. 

मुलीचे माहेर झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात आहे. व्हिडीओमध्ये मुलीने सांगितले की, "तिच्या आईचे गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये निधन झाले होते. वडील एका महिलेच्या संपर्कात आले आणि तिच्याशी लग्न केलं. मुलगी म्हणाली, वडिलांवर खूप कर्ज होते. तेव्हा 52 वर्षीय व्यक्तीने त्यांना सांगितलं की, तो त्यांचे कर्ज फेडणार आहे. त्या बदल्यात त्याने माझ्याशी लग्न करण्याची मागणी केली. सावत्र आईनेही वडिलांवर दबाव टाकला. मला याचा काहीच अंदाज नव्हता."

"मला जुलै महिन्यात फिरायला जातोय असं सांगून बाहेर नेलं. त्यानंतर तिथे माझं त्या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. या लग्नाला विरोध करत असल्याचं" मुलीने सांगितले. पण तिचं कोणीही ऐकलं नाही. लग्न करून ती भागलपूरला पोहोचली तेव्हा तिचा नवरा तिला रोज मारहाण करू लागला. तो तिला शिवीगाळही करायचा. तो बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा. हा सगळा छळ तिला सहन झाला नाही आणि एक दिवस तिने गुपचूप सासरच्या घरातून पळ काढला आणि भागलपूरमध्ये आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरच्या घरी पोहोचली.

मुलीने सांगितले की, मंगळवारी तिने पती आणि वडिलांची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी तिला मदत केली नाही. तर, हे प्रकरण या राज्याचं नाही, असं सांगून तिला पोलीस ठाण्यातून परत पाठवण्यात आलं. यानंतर ती इसाकचक पोलीस ठाण्यात गेली मात्र तेथेही तिची तक्रार ऐकून घेण्यात आली नाही. याला कंटाळून मुलीने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला. व्हिडीओच्या माध्यमातून न्याय मागितला आहे. मला न्याय मिळाला नाही तर मी मरेन, असे सांगितलं

या प्रकरणी भागलपूरचे एसपी आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मुलगी अल्पवयीन असेल तर तिच्या कुटुंबीयांवरही कारवाई केली जाईल. ती मुलगी सांगत आहे की, तिचा जन्म 2007 मध्ये झाला होता. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यानंतर तिचं लग्न झालं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न