शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

कंटेनर आणि चार चाकीचा भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:59 IST

Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे एक कंटेनर आणि मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेमध्ये मॅजिक गाडीमधील ७ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे एक कंटेनर आणि मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेमध्ये मॅजिक गाडीमधील ७ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या मदतीसाठी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

हा अपघात हाथरस जंक्शन ठाण्याच्या हद्दीतील बरेली-मथुरा मार्गावरील जैतपूर गावाजवळ झाला. आज दुपारच्या सुमारास एका कंटेनरने प्रवाशांनी भरलेल्या मॅजिक गाडीला धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की त्यात मॅजिक गाडीचा चेंदामेंदा झाला. तसेच ही गाडी उलटून एका खड्ड्यात जाऊन पडली.  तसेच त्यामधून प्रवास करत असलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तिथे धाव घेतली. तसेच जखमींना बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर एका महिलेने उपचारांदरम्यान, प्राण सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार मॅजिकमधून प्रवास करत असलेले २० जण हे चंदपा क्षेत्रातील कुम्हरई गावातील रहिवासी होतो. तसेच कर्करोगाने पीडित असलेल्या आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी एटा येथील नगला इलमिया गावात जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. 

 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश