शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

FASTag चे दिवस जाणार! आता नव्या तंत्रज्ञानानं टोल वसुली करणार सरकार, रिचार्जची गरजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 15:06 IST

टोल वसुलीसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर याची अंमलबजावणी झाली, तर FASTag तंत्रज्ञानाचीही गरज पडणार नाही.

नवी दिल्ली-

टोल वसुलीसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर याची अंमलबजावणी झाली, तर FASTag तंत्रज्ञानाचीही गरज पडणार नाही. केंद्र सरकार जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोल टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत आहे. सध्या हे सर्व काम वाहनाच्या काचेवर लावलेल्या FASTag द्वारे केलं जातं. FASTag रिचार्ज करणं आवश्यक आहे आणि वाहन टोल प्लाझातून जाताच, प्लाझावरील RFID वाचक FASTag मधून पैसे कापतात. यामध्ये चालकाला काही करण्याची गरज नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट आधारित टोल वसुली सिस्टमची तपासणी सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये सुरू आहे.

नव्या तंत्रज्ञानामध्ये जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या आधारे टोल टॅक्स वसूल केला जाणार आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही जितकं अंतर कापता तितकाच टोल टॅक्स तुमच्याकडून आकारला जाईल. महामार्गावरील अंतरासाठी टोल घेतला जाईल. या वर्षी मार्चमध्ये रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले होतं की सरकार पुढील एका वर्षात देशभरातील सर्व टोल प्लाझा बूथ हटवेल. या दिशेनं काम वेगानं सुरू आहे.

सरकारचं म्हणणं काय?टोल बुथच्या जागी जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. जीपीएस इमेजिंगच्या मदतीनं महामार्ग किंवा एक्स्प्रेस वेवर चालणाऱ्या वाहनांकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल. जीपीएस आधारित टोल टॅक्स वसुलीचे तंत्रज्ञान सध्या अनेक युरोपीय देशांमध्ये आधीच लागू करण्यात आलं आहे आणि त्यास मिळालेलं यश पाहता भारतातही लागू केली जाणार आहे. सध्याच्या नियमात टोल टॅक्सच्या मोजणीसाठी महामार्गाचे अंतर म्हणजेच एका पट्ट्याचे अंतर ग्राह्य धरलं जाते. हे सहसा ६० किमी असतं आणि जर ते कमी किंवा जास्त असेल तर त्यानुसार कर देखील बदलला जातो. परंतु ६० किमी मानक मानलं जातं. त्याच रस्त्यावर एखादा पूल, कल्व्हर्ट किंवा ओव्हरब्रिज पडला तर त्याचा टोल बदलतो.

नव्या तंत्रज्ञानात काय?नवीन तंत्रज्ञानामध्ये तुमची कार किती अंतर कापेल या आधारावर टोलचे पैसे कापले जातील. त्यासाठी दोन तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. पहिल्या तंत्रज्ञानामध्ये, वाहनात जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञान असेल, ज्यामुळे महामार्गावरील सॅटेलाइटद्वारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोलचे पैसे कापले जातील. दुसरं तंत्र म्हणजे नंबर प्लेटद्वारे टोल वसुली.

नंबर प्लेटवर टोलसाठी संगणकीकृत प्रणाली असेल जी सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल वसूल करण्यास मदत करेल. या तंत्रात महामार्गावर वाहन कोणत्या पॉइंटवरून प्रवेश करेल, त्याची माहिती नोंदवली जाईल. यानंतर महामार्गावरून गाडी ज्या पॉईंटवर जाईल, तेथेही त्याची नोंदणी केली जाईल. या दरम्यान, महामार्गावर वाहन किती किलोमीटर चालले असेल त्यानुसार वाहन मालकाच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कापले जातील.

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाका