शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

अरे देवा! लग्नात गरमागरम चपाती न मिळाल्याने तुफान राडा; फेकल्या खुर्च्या, झाली हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 5:11 PM

लग्नात आलेल्या पाहुण्यांना गरमागरम चपाती न मिळाल्याने गोंधळ उडाला. पाहुण्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या.

लग्नामध्ये अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. यूपीच्या फर्रुखाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांना गरमागरम चपाती न मिळाल्याने गोंधळ उडाला. पाहुण्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. एवढंच नाही तर त्याने आचाऱ्यालाही रिव्हॉल्व्हर दाखवलं. फर्रुखाबादच्या शमसाबाद पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. सुभाष यांची मुलगी सुधा हिचं लग्न होतं. कासगंज येथून वरात आली होती. 

लग्नाची वरात उशीरा आली. नवरदेव शिवमच्या मित्रांनी वेटरकडे गरम चपाती मागतली. तेव्हा वेटरने गरम चपाती मिळणार नाही असं सांगितलं. यानंतर आलेल्या पाहुण्यांनी जेवण करणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यास सांगितलं. त्याला थेट रिव्हॉल्व्हर दाखवत धमकावलं. यावरून पुढे वाद सुरू झालं. वादाचं रुपांतर नंतर हाणामारीमध्ये झालं. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. 

पोलिसांनी लग्नासाठी आलेले अनेक पाहुणे आणि कुटुंबीयांना पकडून पोलीस ठाण्यात नेलं. ज्यांच्यासोबत वाद झाला ते लोक दारूच्या नशेत होते, असा आरोप केला आहे. गरम चपाती न मिळाल्याने नवरदेवाने लग्नाची वरात परत फिरवली. याआधी दोघांचा साखरपुडा झालेला आहे. 

लग्नाची वरात आधीच खूप उशिरा पोहोचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर काही पाहुणे दारूच्या नशेत बराच वेळ नाचत राहिले. त्यामुळे जेवायला खूप उशीर झाला. यानंतर ते पाहुणे जेवायला बसले तेव्हा गरम चपाती न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला. त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. तसेच हाणामारी देखील केली. यानंतर लग्न झालंच नाही.  

टॅग्स :marriageलग्न