शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

'भारत माता की जय' म्हटल्याने काश्मीरमध्ये फारुक अब्दुलांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:47 IST

बकरी ईदनिमित्त मस्जीदमध्ये नमाज पडण्यासाठी गेल्यानंतर फारुक यांना लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला. त्यावेळी ते काही वेळ गप्प राहिले, पण लोकांचा विरोध वाढतच गेल्याने त्यांनी मस्जीदमधून

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. अब्दुल्ला यांनी भारत माता की जय आणि जय हिंदचा नारा दिला होता. त्यानंतर, काश्मीरमध्ये त्यांना लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला. बुधवारी बकरी ईदची नमाज पडण्यासाठी फारुक अब्दुल्ला गेले होते, त्यावेळी त्यांना विरोध करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली असून त्यांच्याकडे चप्पल फेकल्याचेही सांगण्यात येत आहे.

बकरी ईदनिमित्त मस्जीदमध्ये नमाज पडण्यासाठी गेल्यानंतर फारुक यांना लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला. त्यावेळी ते काही वेळ गप्प राहिले, पण लोकांचा विरोध वाढतच गेल्याने त्यांनी मस्जीदमधून काढता पाय घेतला. मात्र, जर वेडसर लोकांना वाटत असेल की, त्यांच्या अशा वागण्यामुळे मी घाबरेल. पण, मला 'भारत माता की जय' म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.   तसेच मी घाबरलो नाही, आंदोलकांच्या या वागणुकीचा माझ्यावर काहीही परिमाण होणार नाही. भारत देश पुढे जात असून काश्मीरलाही आपल्या पायावर उभे राहायचे आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांनी नमाजावेळी असे करणे चुकीचे आहे. यासाठी त्यांनी दुसरी वेळ निवडायला हवी होती, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदच्या निमित्ताने येथील हजरतबल मस्जीदमध्ये फारुक अब्दुल्ला नमाज पठण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेकडो स्थानिक नागरिक या मस्जीदमध्ये नमाज पडण्यासाठी आले होते. येथील इमामांच्या नमाज पठणापूर्वीच अब्दुलांच्या नावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यानंतर अब्दुल्ला यांनी तेथून पळ काढला. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता शांतीपूर्ण चर्चेची वेळ आली आहे. द्वेष भावनेतून बाहेर पडण्याची हीच खरी वेळ आहे. हा देश हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई आणि येथील रहिवाशांचा आहे. दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना, फारुक अब्दुल्ला यांनी भारत माता की जय आणि जय हिंदचा नारा दिला होता. त्यामुळे तेथील लोकांनी त्यांचा विरोध केला आहे.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाSrinagarश्रीनगरNamajनमाजJammu Kashmirजम्मू-काश्मीर