शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Farmer Protest : आंदोलनाला होणार चार महिने पूर्ण; शेतकरी नेत्यांची २६ मार्चला 'भारत बंद'ची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 21:30 IST

Farmer Protest : १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन

ठळक मुद्दे१०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन'टिकैत पश्चिम बंगाललाही जाणार, शेतकऱ्यांची घेणार भेट

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होऊन १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. सरकार आणि संघटनांच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असून त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकरी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपीवर कायदा करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान २६ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.यापूर्वी शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केला होती. तसंच निरनिराळ्या व्यक्तींविरोधात ३८ गुन्हे दाखल करण्यात आली होती. दरम्यान, दुसरीकडे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आगामी १३ मार्च रोजी कोलकात्यात जाण्याची घोषणा केली आहे. तसंच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं आहे. परंतु आपण कोणत्याही पक्षाचं समर्थन करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. १३ मार्च रोजी आपण कोलकात्याला जाणार असून तेथूनच निर्णायक संघर्षाचं बिगुल फुंकणार असल्याचं टिकैत म्हणाले. भाजपच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी त्रस्त आहेत. पश्चिम बंगालमध्ये आपण शेतकऱ्यांची चर्चा करणार आहोत. तसंच भाजपला पराभूत करण्याचं आवाहनही करणार आहोत. याव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला समर्थन बिलकुल देणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. मतं मागण्यास जात नाहीआपण पश्चिम बंगालमध्ये मतं मागण्यास जात नाही. तसंच त्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याचंही टिकैत यांनी सांगितलं. यानंतर टिकैत यांनी महापंचायतीला संबोधित केलं आणि मोदी सरकारवर हल्लाबोलही केला. गेल्या काही महिन्यांमध्ये सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. परंतु त्यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. सरकारनं हे कायदे दीड वर्षांपर्यंत पुढे ढकलण्याची तसंच यात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु शेतकरी संघटना हे कायदे रद्द करण्यासाठी तसंच एमएसपीवर कायदा तयार करण्यावर ठाम आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBharat Bandhभारत बंदrakesh tikaitराकेश टिकैतwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा