शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Farmer Protest : आंदोलनाला होणार चार महिने पूर्ण; शेतकरी नेत्यांची २६ मार्चला 'भारत बंद'ची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 21:30 IST

Farmer Protest : १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन

ठळक मुद्दे१०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन'टिकैत पश्चिम बंगाललाही जाणार, शेतकऱ्यांची घेणार भेट

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होऊन १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. सरकार आणि संघटनांच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असून त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकरी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपीवर कायदा करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान २६ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.यापूर्वी शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केला होती. तसंच निरनिराळ्या व्यक्तींविरोधात ३८ गुन्हे दाखल करण्यात आली होती. दरम्यान, दुसरीकडे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आगामी १३ मार्च रोजी कोलकात्यात जाण्याची घोषणा केली आहे. तसंच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं आहे. परंतु आपण कोणत्याही पक्षाचं समर्थन करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. १३ मार्च रोजी आपण कोलकात्याला जाणार असून तेथूनच निर्णायक संघर्षाचं बिगुल फुंकणार असल्याचं टिकैत म्हणाले. भाजपच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी त्रस्त आहेत. पश्चिम बंगालमध्ये आपण शेतकऱ्यांची चर्चा करणार आहोत. तसंच भाजपला पराभूत करण्याचं आवाहनही करणार आहोत. याव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला समर्थन बिलकुल देणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. मतं मागण्यास जात नाहीआपण पश्चिम बंगालमध्ये मतं मागण्यास जात नाही. तसंच त्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याचंही टिकैत यांनी सांगितलं. यानंतर टिकैत यांनी महापंचायतीला संबोधित केलं आणि मोदी सरकारवर हल्लाबोलही केला. गेल्या काही महिन्यांमध्ये सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. परंतु त्यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. सरकारनं हे कायदे दीड वर्षांपर्यंत पुढे ढकलण्याची तसंच यात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु शेतकरी संघटना हे कायदे रद्द करण्यासाठी तसंच एमएसपीवर कायदा तयार करण्यावर ठाम आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBharat Bandhभारत बंदrakesh tikaitराकेश टिकैतwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा