शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलन चिघळलं, हजारो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह 150 जवानांना ठेवलं ओलिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 16:10 IST

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सूरू आहे.

श्रीगंगानगर: श्रीगंगानगरच्या घाडसानामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी धुमसत असलेल्या ठिणगीने रौद्र रुप धारण केलं. शनिवारी रात्री उशिरा हजारो शेतकऱ्यांनी DSPसह सुमारे 150 पोलीस कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं. त्यांना सकाळीही बाहेर पडू दिलं जात नव्हतं. तणावाच्या पार्श्वभूमीवर घाडसानामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवरील शेतकरी चळवळीच्या उलट, या आंदोलनात राजस्थानचे गेहलोत सरकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या घाडसानमधील हे आंदोलक शेतकरी सिंचनासाठी पाण्याची मागणी करत आहेत. काही दिवसात त्यांना पाणी न दिल्यास त्यांचे हजारो एकर पीक उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी चर्चेसाठी न पोहचल्याने दीर्घकाळ सुरू असलेले शेतकरी आंदोलन वाढण्याची शक्यता आहे. सध्या 10 हजारांहून अधिक शेतकरी येथे जमले असून, ही संख्या सतत वाढत आहे. मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी याच ठिकाणी जेवणाचीही व्यवस्था केली आहे.

शेतकऱ्यांचा गेहलोत सरकारला इशारा

राजस्थानमध्ये पाण्याच्या अभावी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला पाणी न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. सध्या आंदोलक शेतकऱ्यांनी एसडीएम कार्यालयाला घेराव घातला असून, पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कोणीही आत किंवा बाहेर जाऊ शकणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. ओलिस झालेल्यांमध्ये डीएसपी जयदेव सिहाग आणि आणखी एक उच्च पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानFarmers Protestशेतकरी आंदोलन