शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: January 9, 2016 02:41 IST2016-01-08T23:20:12+5:302016-01-09T02:41:41+5:30
सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या .

शेतकरी आत्महत्या
खंडाळा (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील महादेव पूर्णाजी सांगुनवेढे (६५) या शेतकर्याने शुक्रवारी आत्महत्या केली. सांगुनवेढे यांच्याकडे एक एकर शेती होती. त्यांनी केळीचे पीक घेतले; मात्र सततच्या नापिकीमुळे ते हवालदिल झाले होते. शुक्रवारी सकाळी ते शेतात गेले व कीटकनाशक प्राशान केले त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. महादेव सांगूनवेढे यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे.