शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आंदोलकांची संख्या दुपटीवर करण्यासाठी शेतकऱ्यांची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 04:01 IST

कृषी कायद्याच्या प्रती जाळल्या, शेतकऱ्यांमध्ये रोष कायम!

विकास झाडे लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली असली तरी, शेतकरी समाधानी नाहीत. बुधवारी सिंधू सीमेवर तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रतींची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा निषेध करीत, कायदे मागे घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, अशी घोषणाबाजी केली. 

बुधवार हा आंदोलनाचा ४९ वा दिवस होता. यादरम्यान जवळपास ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुप्रीम कोर्टाने या आंदोलनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, केंद्र सरकारवर दोषारोप केले असले तरी, न्यायालयाने दिलेला निर्णय हा केवळ आंदोलन संपविण्यासाठी आहे, तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना कायद्यांची तात्पुरती स्थगिती नको असल्याने हे आंदोलन कायम राहणार आहे. उलट या आंदोलनातील सहभागींची संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत दुपटीने वाढविण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. न्यायालयाने हस्तक्षेप केला असला तरीही मागे हटायचे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. गणतंत्रदिनी राजपथवर परेड करण्याआधीच घोषित केल्यानुसार शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या सीमेवर दररोज तालीम सुरू आहे. राजपथावर घोडेस्वारी करण्यासाठी एक तरुण शेतकरी सुशीलकुमार हा पंजाबच्या लखेलीवाली डाल इथून गाझीपूर सीमेवर पोहोचला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप