शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा कायदा स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, गणतंत्रदिनी रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:54 IST

शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत.

विकास झाडे -नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षासाठी स्थगित करणे आणि तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करणे हा केंद्र सरकारचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत. आतापर्यंत १४७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. गणतंत्र दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे निश्चित केले आहे. आज दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना रॅली काढू नका म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. ही रॅली दिल्लीच्या रिंंग रोेडवर काढली जाणार आहे. दि. २३ रोजी देशभरात राजभवनाला घेराव घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. आंदोलनात केली शेतकऱ्याने आत्महत्या -टिकरी सीमेवर शेतकरी जय भगवान (४२) यांनी आंदोलनादरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयात नेण्यात येत असताना भगवान यांचा मृत्यू झाला. विष खायच्या आधी त्यांनी देशवासियांच्या नावाने पत्र लिहिले. रोहटक जिल्ह्यातील पाकस्मा गावातील शेतकरी जय भगवान दोन-तीन दिवसांपूर्वी आंदोलनात सहभागी व्हायला दिल्लीत आले होते. तेथे त्यांनी कृषी कायदे रद्द न होणे , शेतकरी आणि सरकार दोघेही आपल्या भूमिकांवर अडून बसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.

सरकारवर विश्वास ठेवायचा कसा?एका शेतकरी नेत्याने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश शेतकरी नेते ही सरकारच्चा प्रस्ताव फसवा असून या प्रस्तावाला विरोध करायचा या मताचे आहेत. तर काहींना वाटते सरकारचा प्रस्ताव मान्य करायचा आणि सरकारने तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून हे कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली