शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सरकारचा कायदा स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, गणतंत्रदिनी रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:54 IST

शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत.

विकास झाडे -नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षासाठी स्थगित करणे आणि तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करणे हा केंद्र सरकारचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत. आतापर्यंत १४७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. गणतंत्र दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे निश्चित केले आहे. आज दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना रॅली काढू नका म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. ही रॅली दिल्लीच्या रिंंग रोेडवर काढली जाणार आहे. दि. २३ रोजी देशभरात राजभवनाला घेराव घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. आंदोलनात केली शेतकऱ्याने आत्महत्या -टिकरी सीमेवर शेतकरी जय भगवान (४२) यांनी आंदोलनादरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयात नेण्यात येत असताना भगवान यांचा मृत्यू झाला. विष खायच्या आधी त्यांनी देशवासियांच्या नावाने पत्र लिहिले. रोहटक जिल्ह्यातील पाकस्मा गावातील शेतकरी जय भगवान दोन-तीन दिवसांपूर्वी आंदोलनात सहभागी व्हायला दिल्लीत आले होते. तेथे त्यांनी कृषी कायदे रद्द न होणे , शेतकरी आणि सरकार दोघेही आपल्या भूमिकांवर अडून बसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.

सरकारवर विश्वास ठेवायचा कसा?एका शेतकरी नेत्याने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश शेतकरी नेते ही सरकारच्चा प्रस्ताव फसवा असून या प्रस्तावाला विरोध करायचा या मताचे आहेत. तर काहींना वाटते सरकारचा प्रस्ताव मान्य करायचा आणि सरकारने तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून हे कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली