शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : "शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 12:22 IST

Farmers Protest : "आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे, सरकारने सर्व अडथळे दूर करावेत" असंही पंढेर यांनी म्हटलं.

आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकरीदिल्लीत प्रवेश करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी संवाद साधला आहे. "शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे" असं म्हटलं आहे. 

"आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे, सरकारने सर्व अडथळे दूर करावेत" असंही पंढेर यांनी म्हटलं. "आज केंद्रीय मंत्र्यांसोबत आमची बैठक आहे. बैठकीत आम्ही आमच्या मागण्या मांडणार आहेत. या बैठकीनंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. आमच्या मागण्या नवीन नाहीत. हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे" असं सरवन सिंग पंढेर यांनी सांगितलं.

"आम्हाला असं वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा आणि आम्हाला शांततेने आंदोलन करू द्यावे. आज आपली केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक आहे. आमच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी देखील चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे."

"भारत हा लोकशाही देश आहे, त्यामुळे आम्हाला राजधानीत शांततेने आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकारने सर्व अडथळे दूर करावेत. आज चंदीगडमध्ये शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार आहे" अशी माहिती सरवन सिंग पंढेर यांनी दिली आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी