शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

Farmers Protest :  आम्ही कृषी कायदे अत्यंत विचारपूर्वक तयार केलेत - कृषीमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 16:05 IST

Farmers Protest : कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता शेतकऱ्यांनी देशभरात तीव्र आंदोलन आणि रेल्वे ट्रॅक जाम करण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या 16 दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता शेतकऱ्यांनी देशभरात तीव्र आंदोलन आणि रेल्वे ट्रॅक जाम करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांनी कुणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिला आहे. तसेच, सरकार अद्याप चर्चेसाठी तयार आहे. आम्ही प्रत्येक समस्येचा विचार करीत आहोत, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

'कृषी कायदे अत्यंत विचारपूर्वक'कृषीमंत्री म्हणाले, "भारत सरकारने अत्यंत विचारपूर्वक कृषी कायदे केले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तयार केले आहेत. वर्षानुवर्षे शेतकर्‍यांवर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी तयार केले आहेत. तरीही सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करून कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहे."

याचबरोबर, शेतकरी आंदोलनादरम्यान संघटनांशी सहा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. सरकारची सतत विनंती अशी होती की, कायद्याच्या कोणत्या तरतुदी आहेत, ज्यावर शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. अनेक चर्चेवेळी शक्य हे झाले नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे द्यावे. सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठविला आहे. कोणत्याही कायद्याच्या तरतुदींवर आक्षेप असल्यास त्याबाबत चर्चा झाली आहे आणि पुढेही करता येईल. आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे (शेतकरी) आहे. त्यांनी त्याविषयी चर्चा केली, पण आम्हाला त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही, असे नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.

आता शेतकऱ्यांचा काय प्लॅन?आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हे तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आता आंदोलन मोठ्या पातळीवर नेण्याचा शेतकरी निर्धार करीत आहेत. आता 12 डिसेंबरपासून शेतकरी देशभर टोल नाके फ्री करण्याची तयारी करत आहेत. तर 14 डिसेंबर रोजी देशभरातील भाजपा नेत्यांना घेराव करून जिल्हा मुख्यालयात निदर्शने करण्याची योजना आहे. एवढेच नव्हे तर सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी 12 डिसेंबरपासून दिल्लीचा वेढा वाढवण्याचा इशाराही दिला आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाFarmerशेतकरी