शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Farmer's Protest: निहंग प्रमुखांसोबत केंद्रीय कृषिमंत्री Narendra Singh Tomar यांच्या फोटोमुळे खळबळ, सरकारवर झाले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 08:33 IST

Farmer's Protest Update: मंगळवारी निहंग समुहाचे प्रमुख Baba Aman Singh यांचा एक कथित फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते केंद्रीय कृषिमंत्री Narendra Singh Tomar यांच्यासोबत दिसत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येनंतर निहंग समूह चर्चेत आहे. दरम्यान, मंगळवारी निहंग समुहाचे प्रमुख बाबा अमन सिंग यांचा एक कथित फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत दिसत आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने त्यांना आंदोलनस्थळ सोडून जाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप बाबा अमन सिंग यांनी केला आहे. तर या फोटोंमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, असे विधान पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी केले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार ज्या फोटोमुळे गोंधळ उडाला आहे. त्यामध्ये कृषिमंत्री तोमर, बाबा अमन सिंग, पंजाब पोलिसांचे अधिकारी गुरमित सिंग पिंकी दिसत आहे. पिंकी यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांना हत्येच्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले होते. हा फोटो सुमारे दोन महिन्यांपूर्वीचा आहे. रिपोर्टनुसार सिंघू बॉर्डरवर झालेल्या दलित शीखाच्या हत्येप्रकरणी अमन सिंग याच्या समुहातील सदस्य हा मुख्य आरोपी आहे. दरम्यान, अमन सिंग याने या हत्येचे समर्थन केले होते.

दरम्यान, अमन सिंग याने मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मला शेतकरी आंदोलनाचे आंदोलनस्थळ सोडून जाण्यासाठी १० लाख रुपयांची ऑफर देण्यात आसली होती. माझ्या संघटनेलाही १ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आम्हाला खरेदी करता येणार नाही.

दरम्यान, निहंग सिंघू बॉर्डरवर राहतील की नाही याचा निर्णय २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र कृषी मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरमित सिंग यांनी सांगितले की, मी बाबा अमन यांना ओळखतो आणि ऑगस्ट महिन्यात आम्ही मंत्र्यांच्या घरी गेलो होतो, हे खरे आहे. मात्र या भेटीचा हेतू वेगळा होता. मी काही वैयक्तिक कामामुळे तिथे गेलो होतो. निहंग प्रमुख कृषी कायद्यांवर चर्चा करत होते. मात्र तिथे पैसे देण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आला नाही. अमन सिंग आणि नरेंद्र सिंग तोमर यांच्यात काय ठरले, हे मला माहिती नाही. पंजाबचे उपमुख्यमंत्री रंधावा यांनी नाव न घेता दावा केला की, हाच निहंग नेता हत्येच्या मुख्य आरोपीचा बचाव करत होता. या समुहाने पीडितावर शीख समुदायाच्या पवित्र ग्रंथाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, निहंग नेते हे भारत सरकार आणि कृषिमंत्र्यांशी संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, असा दावाही रंधावा यांनी केला आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरCentral Governmentकेंद्र सरकार