शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

Farmers Protest : शंभू बॉर्डरवर गोंधळ! शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; कृषीमंत्र्यांची ऑफर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:45 IST

Farmers Protest : दिल्लीच्या दिशेने शेतकरी पुढे सरकू लागले आहेत. मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर बुधवारी (21 फेब्रुवारी 2024) सकाळी दिल्लीच्या दिशेने शेतकरी पुढे सरकू लागले आहेत. मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना पुढे न जाण्याचं आवाहन केलं आहे.

केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आपल्या ट्विटर काऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सरकार चौथ्यांदा चर्चा केल्यावर आता पाचव्यांदा देखील चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो. शांतता राखणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे" असं अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे.  शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दिल्लीकडे कूच करण्याचा विचार करत आहेत. उद्या चंदीगडमध्ये संयुक्त किसान मोर्चाची (SKM) बैठक होणार आहे. ते भविष्यातील रणनीती ठरवतील. ही बैठक समोरासमोर होणार असून, त्यात देशभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. एमएसपी हमी कायदा करावा. तसं न केल्यास संपूर्ण देशाचे नुकसान होईल. सरकार या विषयावर बोलत नाही.

शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी बॉर्डरवर स्पेशल अलर्ट देण्यात आला आहे. आज जवळपास 14 हजार शेतकरी सोबत आणलेल्या 1200 ट्रॅक्टरसह दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. पंजाबच्या डीजीपींनी सर्व रेंजचे एडीजी, आयजीपी आणि डीआयजी यांना पत्र लिहून कुठल्याही परिस्थितीत जेसीपी, पोकलेन, टिपर, हायड्रा अशा अवजड वाहनांना हरियाणाच्या खनौरी आणि शंभू बॉर्डरच्या दिशेने पुढे येऊ देऊ नका, अशे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPoliceपोलिस