शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम, 'या' तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 6, 2021 20:04 IST

टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा... (Rakesh tikait)

नवी दिल्ली - केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh tikait) यांनी केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे टिकैत यांनी म्हटले आहे. ते शनिवारी चक्का जामनंतर दिल्ली-यूपी गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांशी बोलत होते. (Government must repeal farm laws till 2nd october syas Rakesh tikait)

टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. आम्ही सरकारला कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. यानंतर आम्ही पुढील योजना आखू. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा पुढच्या आंदोलनात, ज्यांची मुलं सीमेवर अथवा पोलिसात आहेत, त्यांचे कुटुंबीय येथे असतील. त्यांचे वडिल त्यांचा फोटो घेऊन येथे बसतील. फोट केव्हा घेऊन यायचे हेही मी सांगेन. 

खूशखबर! PM किसान सन्मान स्कीमशी जोडली गेली KCC योजना; 175 लाख अर्ज मंजूर, मिळवा मोठा फायदा

मग म्हणून नका, हे कसे आंदोलन - सरकारने कायदे मागे घ्यावेत, एमएमसपीवर कायदा करावा. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही देशभर प्रवास करू. आमचे अराजकीय आंदोलन संपूर्ण देशात होईल. मग असे म्हणून नका, की हे कसे आंदोलन आहे, असेही टिकैत म्हणाले.

यांचे देशावर नव्हे व्यापाऱ्यांवर प्रेम -सरकारवर निशाणा साधताना टिकैत म्हणाले, 'आम्ही तिरंग्याला मानतो. आमची मुलं तिरंग्यासाठी मरतात, ते गावातही यातच येतात. तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही. यांचे देशावर नाही, व्यापाऱ्यांवर प्रेम आहे. शेतकऱ्यांवर यांचे प्रेम नाही, त्यांच्या अन्न धान्यावर प्रेम आहे. यांचे मातीवर नाही अन्नावर प्रेम आहे. हे खिळे पेरतील आम्ही धान्य पेरू.

Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा 

टिकैत म्हणाले, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र, एक अट आहे, की प्लॅटफॉर्म बरोबरीचा असेल, तेव्हाच चर्चा होईल. येथे कुणी ट्रॅक्टर घेऊन आला तर नोटीस पाठवली जात आहे. हा कुठला कायदा आहे. 

आज आंदोलक शेतकऱ्यांनी 3 तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती. या अंतर्गत दुपारी 12 ते 3 या वेळेत आंदोलक शेतकऱ्यांनी देशात अनेक ठिकाणी महामार्ग जाम केलेहोते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप