शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

Farmers Protest: राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम, 'या' तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 6, 2021 20:04 IST

टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा... (Rakesh tikait)

नवी दिल्ली - केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh tikait) यांनी केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे टिकैत यांनी म्हटले आहे. ते शनिवारी चक्का जामनंतर दिल्ली-यूपी गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांशी बोलत होते. (Government must repeal farm laws till 2nd october syas Rakesh tikait)

टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. आम्ही सरकारला कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. यानंतर आम्ही पुढील योजना आखू. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा पुढच्या आंदोलनात, ज्यांची मुलं सीमेवर अथवा पोलिसात आहेत, त्यांचे कुटुंबीय येथे असतील. त्यांचे वडिल त्यांचा फोटो घेऊन येथे बसतील. फोट केव्हा घेऊन यायचे हेही मी सांगेन. 

खूशखबर! PM किसान सन्मान स्कीमशी जोडली गेली KCC योजना; 175 लाख अर्ज मंजूर, मिळवा मोठा फायदा

मग म्हणून नका, हे कसे आंदोलन - सरकारने कायदे मागे घ्यावेत, एमएमसपीवर कायदा करावा. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही देशभर प्रवास करू. आमचे अराजकीय आंदोलन संपूर्ण देशात होईल. मग असे म्हणून नका, की हे कसे आंदोलन आहे, असेही टिकैत म्हणाले.

यांचे देशावर नव्हे व्यापाऱ्यांवर प्रेम -सरकारवर निशाणा साधताना टिकैत म्हणाले, 'आम्ही तिरंग्याला मानतो. आमची मुलं तिरंग्यासाठी मरतात, ते गावातही यातच येतात. तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही. यांचे देशावर नाही, व्यापाऱ्यांवर प्रेम आहे. शेतकऱ्यांवर यांचे प्रेम नाही, त्यांच्या अन्न धान्यावर प्रेम आहे. यांचे मातीवर नाही अन्नावर प्रेम आहे. हे खिळे पेरतील आम्ही धान्य पेरू.

Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा 

टिकैत म्हणाले, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र, एक अट आहे, की प्लॅटफॉर्म बरोबरीचा असेल, तेव्हाच चर्चा होईल. येथे कुणी ट्रॅक्टर घेऊन आला तर नोटीस पाठवली जात आहे. हा कुठला कायदा आहे. 

आज आंदोलक शेतकऱ्यांनी 3 तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती. या अंतर्गत दुपारी 12 ते 3 या वेळेत आंदोलक शेतकऱ्यांनी देशात अनेक ठिकाणी महामार्ग जाम केलेहोते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप