शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Farmers Protest:...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तामिळनाडूत घुसू देणार नाही; शेतकरी आंदोलन चिघळलं

By प्रविण मरगळे | Updated: February 7, 2021 10:36 IST

पंतप्रधान शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी देत नसतील तर तामिळनाडूतील शेतकरी त्यांना राज्याचा दौरा करू देणार नाहीत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी दिल्ली सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेड्स आणि लोखंडी खिळे तातडीने हटवण्यात यावेतशेतकऱ्यांची अवहेलना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद करावी, याच लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतंशेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश मिळत नाही हे दुर्दैव, यामुळेच भाजपा शेतकऱ्यांचा सन्मान करत नाही हे स्पष्ट होतं

चेन्नई – गेल्या ३ महिन्यापासून देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यानंतर या आंदोलनात देशविरोधी शक्तींचाही हात असल्याचा आरोप होऊ लागला, अशातच आता एका शेतकरी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या धमकीमुळे पुन्हा आंदोलन वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

ऑल फार्मर्स असोसिएशन को-ऑर्डिनेशन कमिटीने शनिवारी जर शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तामिळनाडूत घुसू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे, या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा आहे, त्यापार्श्वभूमीवर या शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना इशारा दिला आहे. ऑल फार्मर्स असोसिएशन को-ऑर्डिनेशन कमिटी(AFACC) चं म्हणणं आहे की, जर शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी नसेल आणि धरणं आंदोलन करणाऱ्या ठिकाणी पुन्हा वीज, पाणी सुविधा पुरवली नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तामिळनाडूत घुसू देणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.

संघटनेचे अध्यक्ष पीआर पांडियन म्हणाले की, पंतप्रधान शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी देत नसतील तर तामिळनाडूतील शेतकरी त्यांना राज्याचा दौरा करू देणार नाहीत. शेतकऱ्यांसाठी दिल्ली सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेड्स आणि लोखंडी खिळे तातडीने हटवण्यात यावेत, शेतकऱ्यांची अवहेलना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद करावी, याच लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं असा टोला पांडियन यांनी भाजपाला लगावला.

तसेच केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांऐवजी उद्योगशाहीला पोषक असे कायदे आणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शासनकाळात दिल्लीत कॉर्पोरेट स्वातंत्र्यपणे कुठेही कधी फिरू लागलेत, मात्र शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश मिळत नाही हे दुर्दैव, यामुळेच भाजपा शेतकऱ्यांचा सन्मान करत नाही हे स्पष्ट होतं, शेतकरी आंदोलन हे राजकीय लाभ आणि सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी नसावं हे पीआर पांडियन यांनी सांगितले.

राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम

आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. आम्ही सरकारला कायदे मागे घेण्यासाठी २ ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. यानंतर आम्ही पुढील योजना आखू. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा पुढच्या आंदोलनात, ज्यांची मुलं सीमेवर अथवा पोलिसात आहेत, त्यांचे कुटुंबीय येथे असतील. त्यांचे वडिल त्यांचा फोटो घेऊन येथे बसतील. फोटो केव्हा घेऊन यायचे हेही मी सांगेन. सरकारने कायदे मागे घ्यावेत, एमएमसपीवर कायदा करावा. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही देशभर प्रवास करू. आमचे अराजकीय आंदोलन संपूर्ण देशात होईल. मग असे म्हणून नका, की हे कसे आंदोलन आहे असा इशारा शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीrakesh tikaitराकेश टिकैत