शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च... मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; म्हणाले, "पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 13:38 IST

Farmers Protest : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. 

Farmers Protest :  भारत आज आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.  मात्र, या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पंजाब आणि हरयाणासह देशभरात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. ट्रॅक्टर मोर्चाच्या तयारीबाबत शेतकरी संघटनांनी शनिवारी बैठकही बोलावली होती. दरम्यान, यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. 

भगवंत मान म्हणाले की, पंजाबच्या शेतकऱ्यांनी कधीही देशाला निराश केले नाही. आमचे अन्नदाता आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून यावर योग्य मार्ग काढण्याची गरज आहे.  तसेच, पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत, काही लोक पंजाबला अस्थिर करू पाहत आहेत, असे भगवंत मान यांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये २०० हून अधिक ठिकाणी एक लाखाहून अधिक ट्रॅक्टर रस्त्यावर उतरतील, असे सांगण्यात येत आहे. शेजारच्या हरयाणा राज्यातही असेच निदर्शने दिसून येतात. २६ जानेवारी रोजी देशव्यापी ट्रॅक्टर मार्च काढण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.  याबाबत शेतकरी नेत्यांनी सांगितले की, दुपारच्या वेळेत भाजप कार्यालये, मोठ्या शॉपिंग मॉलबाहेर शेतकरी आपले ट्रॅक्टर उभे करतील.

संयुक्त किसान मोर्चा आणि पंजाब शेतकरी संघटना (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या सदस्यांनीही ट्रॅक्टर मार्चची घोषणा केली आहे.  संयुक्त किसान मोर्चाने पंजाब आणि हरयाणासह देशभरात निषेधार्थ ट्रॅक्टर मार्चचे आवाहन केले आहे. पंजाबमध्ये ट्रॅक्टर मार्च तालुका पातळीवर होईल. या कालावधीत, ट्रॅक्टर आपल्या संबंधित गावातून एका निश्चित मार्गाने तालुक्यातील एका ठिकाणी जातील आणि नंतर त्यांच्या संबंधित गावात परततील. हा ट्रॅक्टर मार्च किमान १०० तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

आम्ही एमएसपीसाठी लढत आहोत- शेतकरी नेतेशेतकरी नेते सरवन सिंग पंधेर म्हणाले की, आम्ही एमएसपीसाठी लढत आहोत. यासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. सरकारने आम्हाला किमान आधारभूत किमतीची हमी देण्याचे आश्वासन दिले होते, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. खरेदी केंद्राकडून केली जाते, त्यामुळे किमान आधारभूत किंमत देण्याची जबाबदारी केंद्राची आहे. एफसीआय केंद्राच्या मालकीचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनPunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान