शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Farmers Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर सब इन्स्पेक्टरने गमावला जीव; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 10:29 IST

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. हरियाणाचे सब इन्स्पेक्टर हिरालाल असं या पोलिसाचं नाव आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल हे 52 वर्षांचे होते आणि त्यांना शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आलं होतं. शंभू बॉर्डर पंजाबमधील पटियाला येथे आहे. सब इन्स्पेक्टर हिरालाल हरियाणाच्या सीमावर्ती भागात तैनात होते.

एएनआयच्या वृत्तानुसार, ड्युटीवर असताना सब इन्स्पेक्टर हिरालाल यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना तातडीने अंबाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. येथील डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. उपचारादरम्यान हिरालाल यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली मार्च'च्या घोषणेवेळी त्यांना शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आलं होतं.

हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर यांनी सब इन्स्पेक्टर यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. कपूर म्हणाले, हिरालाल यांनी आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक बजावलं आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलाचं मोठं नुकसान झालं आहे. शंभू बॉर्डरवर एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला तेव्हाच हिरालाल यांचा देखील मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे. 

78 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू 

शंभू बॉर्डरवर मित्रांसोबत ट्रॉलीमध्ये झोपलेल्या 78 वर्षीय ज्ञान सिंह यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. यानंतर त्यांना आंदोलनात सहभागी असलेल्या रुग्णवाहिकेतून पंजाबच्या राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथून डॉक्टरांनी त्यांना पटियाला येथील राजेंद्र रुग्णालयात हलवले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्ञान सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'दिल्ली चलो' मोर्चात सहभागी होण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी शंभू बॉर्डरवर आले होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPoliceपोलिसFarmerशेतकरी