शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Farmers Protest : १४ डिसेंबरला शेतकरी दिल्लीकडे कूच करणार, शंभू बॉर्डरवरून सर्वनसिंह पंढेर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:23 IST

Farmers Protest : आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

Farmers Protest : नवी दिल्ली : शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा आता १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

आम्ही नेहमीच चर्चेचे स्वागत केले आहे. मात्र, सरकारकडून कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे दोन्ही संघटनांनी १४ डिसेंबरला १०१ शेतकऱ्यांची तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (बुधवार) शेतकरी आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जाईल. तसेच, आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची आमची मागणी आहे, असे सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्वनसिंह पंढेर यांनी पंजाबमधील सर्व गायक आणि प्रसिद्ध व्यक्तींनी पुढे येऊन त्यांच्या मागण्यांसाठी सीमेवर अनेक महिने बसलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन केले.दरम्यान, यापूर्वी, संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली १०१ शेतकऱ्यांच्या गटाने ६ आणि ८ डिसेंबर रोजी पायी दिल्लीला जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते, परंतु हरयाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. 

८ डिसेंबर रोजी शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना मागे हटवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी अनेक शेतकरी जखमीही झाले. त्यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्ली