शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Farmers Protest : १४ डिसेंबरला शेतकरी दिल्लीकडे कूच करणार, शंभू बॉर्डरवरून सर्वनसिंह पंढेर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:23 IST

Farmers Protest : आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

Farmers Protest : नवी दिल्ली : शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा आता १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

आम्ही नेहमीच चर्चेचे स्वागत केले आहे. मात्र, सरकारकडून कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे दोन्ही संघटनांनी १४ डिसेंबरला १०१ शेतकऱ्यांची तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (बुधवार) शेतकरी आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जाईल. तसेच, आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची आमची मागणी आहे, असे सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले.

याचबरोबर, सर्वनसिंह पंढेर यांनी पंजाबमधील सर्व गायक आणि प्रसिद्ध व्यक्तींनी पुढे येऊन त्यांच्या मागण्यांसाठी सीमेवर अनेक महिने बसलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन केले.दरम्यान, यापूर्वी, संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली १०१ शेतकऱ्यांच्या गटाने ६ आणि ८ डिसेंबर रोजी पायी दिल्लीला जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते, परंतु हरयाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. 

८ डिसेंबर रोजी शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना मागे हटवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी अनेक शेतकरी जखमीही झाले. त्यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्ली