शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

आमच्या संयमाचा अंत पाहू नका...शेतकरी नेते डड्डेवाल यांचा सरकारला इशारा; दिले दोन पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 14:53 IST

Farmers Protest: एमएसपीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे.

Farmers Protest: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन तीव्र झाले आहे. शेतकरी बॅरकेड्स तोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शेतकरी नेते जगजितसिंग डड्डेवाल यांनी केंद्र सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. केंद्रातील एनडीए सरकार अडून बसले आहे, त्यामुळे आम्ही सरकारला दोन पर्याय देत आहोत. पहिला- शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा, दुसरा- शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्याची परवानगी द्या.

संयमाचा अंत पाहू नका...पंजाब-हरियाणाला लागून असलेल्या शंभू सीमेवर बुधवारी (21 फेब्रुवारी, 2024) सकाळी पत्रकार परिषदेदरम्यान डड्डेवाल म्हणाले, 'शेतकरी संयमी आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका. देशाने वाईट चित्र पाहू नये, अशी आमची इच्छा आहे. आमचा हेतू अराजकता माजवण्याचा नाही. आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावले, हे योग्य नाही. आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे. सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे, अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही शांतताप्रिय आहोत, त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळायची आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी नियंत्रण गमावू नये.' 

सरकारने MSP चा कायदा करावा- पंढेरशेतकरी नेते पंढेर म्हणाले की, आम्हाला जेव्हा-जेव्हा चर्चेचे निमंत्रण आले, तेव्हा आम्ही त्यात सहभागी झालो. हात जोडून आम्ही केंद्र सरकारला आमच्यासोबत बसून आमचे प्रश्न सोडवण्याची विनंती केली. प्रत्येक मागणीवर चर्चा झाली, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. केंद्र सरकारच्या प्रमुखांनी पुढे एमएसपी कायदा करण्यास तयार असल्याचे सांगितल्यावर परिस्थिती शांत होऊ शकते.'

अडीच लाख कोटी जास्त नाही...'देशातील शेतकरी आईंची मुले आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या बाजूने शांत राहणार आहोत. मात्र, निमलष्करी दलांना आमच्या रक्ताची होळी खेळायची आहे. हा देश सर्वांचा आहे, पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात. 1.5 किंवा 2.5 लाख कोटी रुपये सरकारसाठी जास्त नाहीत. देशातील 80 टक्के लोकसंख्या या पैशावर अवलंबून आहे. आम्हाला शांततेने आंदोलन करू द्यावे. आमच्या बाजूने कोणताही हल्ला होणार नाही,' असेही पंढेर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा