शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेतकऱ्यांना रोख मदतीची योजना केंद्राच्या विचाराधीन?; लोकसभा निवडणुकीवर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 06:27 IST

तीन राज्यांमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने तेथे शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी संपूर्ण देशाच्या पातळीवर अशी कर्जमाफी देणे खिशाला परवडणारी नसल्याने त्रस्त शेतकरीवर्गाला दिलासा देण्याच्या अन्य पर्यायांवर मोदी सरकार विचार करत असल्याचे कळते.

नवी दिल्ली : गेल्या महिन्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यांमधील सत्ता गमावलेली भाजपा तेच लोण आगामी लोकसभा निवडणुकीत पोहोचू नये यासाठी सर्वात जास्त नाराज असलेल्या शेतकरी या मतदारवर्गाला गोंजारण्यासाठी गांभीर्याने कामाला लागली आहे. तीन राज्यांमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने तेथे शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी संपूर्ण देशाच्या पातळीवर अशी कर्जमाफी देणे खिशाला परवडणारी नसल्याने त्रस्त शेतकरीवर्गाला दिलासा देण्याच्या अन्य पर्यायांवर मोदी सरकार विचार करत असल्याचे कळते.सरकारमधील वरिष्ठ माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन पर्यायांवर विचार सुरू असून यापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक कदाचित एप्रिलमध्येही होण्याची शक्यता असल्याने येत्या तीन महिन्यांत तुमच्यासाठी काही तरी केले हे शेतकºयांना दाखविणे गरजेचे आहे.सूत्रांनुसार यापैकी एक पर्याय शेतकºयांना दरमहा ठरावीक रोख रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्याचा आहे. सरकारने शेतमालांचे वाढीव हमीभाव जाहीर केले तरी त्या भावाने सर्व शेतमाल खरेदी करण्याची क्षमता सरकारी यंत्रणेत नाही. त्यामुळे नडलेल्या शेतकºयांना हमीभावाहून कमी दराने आपला माल विकावा लागतो, हा सार्वत्रिक अनुभव आहे. यावर उपाय म्हणून हा रोख रक्कम देण्याच्या पर्यायावर विचार करण्यात येत आहे. संबंधित शेतमालाचा हमीभाव आणि शेतकºयाला प्रत्यक्षात मिळालेला दर याच्या फरकाची रक्कम त्याला द्यायची, अशी ही कल्पना आहे. मात्र ही रक्कम एकदम न देता दरमहा ठरावीक हप्त्याच्या स्वरूपात दिली की शेतकºयाला पुढच्या हंगामापर्यंत कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अधिक सोयीचे होईल, अशी यामागची कल्पना आहे. अशी योजना राबविल्यास देशभरातील १५ कोटी शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिल्यासारखे होईल. संभाव्य मतांच्या हिशेबाने ही संख्या ३० ते ४० कोटींच्या घरात जाऊ शकते.सूत्रांनी असेही सांगितले की, अशा शेतकºयांना रोख मदत देणे सरकारच्या दृष्टीनेही किफायतशीर आहे. शेतकºयांचा सर्व शेतमाल हमीभावाने खरेदी करायचा झाल्यास जेवढा बोजा पडेल त्याच्या तुलनेत हा बोजा खूपच कमी असेल. शिवाय ही मदत दरमहा थोडी-थोडी द्यायची असल्याने तिजोरीवरील ताणही १२ महिन्यांत विभागला जाईल.शेतकºयांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या वचनाच्या पूर्ततेचा भाग म्हणून सरकारने मध्यंतरी कापूस, सोयाबीन आणि भात यासारख्या पिकांच्या आधारभूत किमती किमान ५० टक्क्यांनी वाढविल्या. पण त्या भावाने शेतमाल खरेदी करण्याची व साठविण्याची सोय नसल्याने शेतक-यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही.सुधारित पिकविमा योजनागेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता गोळा होणा-या विमा हप्त्याच्या तुलनेत मिळणारी विम्याची रक्कम तुटपुंजी असल्याने विमा कंपन्याच मालामाल होत असल्याचे चित्र आहे.ते बदलण्यासाठी शेतकºयांना भरावा लागणारा विमा हप्ता कमी करणे, विम्याच्या कक्षेत अधिक पिके आणणे आणि खंडकरी शेतकºयांनाही विम्याचा लाभ देणे असे उपाय तपासून पाहिले जात आहेत.सूत्रांनुसार ज्या दुसºया पर्यायावर विचार सुरू आहे तो मोठा गाजावाजा करून सुरू केलेली प्रधानमंत्री कृषिविमा योजना अधिक शेतकरीस्नेही करण्याचा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी