शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:28 IST

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करताना एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये फूट कशी पाडता येईल, याचेही डावपेच आखतात हे संतापजनक असून गुरुवारी देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन देण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे. गुरुवारी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले जाईल. शेतीविषयक कायदे मागे घ्या अन्यथा होणाऱ्या उद्रेकास केंद्र सरकार जबाबदार राहील, अशी ताकीद या निवेदनाद्वारे दिली जाणार आहे.  या आंदोलनात ४५० संघटना एकसंघ आहेत. कोणीही दिशाभूल करणार असेल तर त्यांना ‘सरळ’ करा असा इशारा देत आपण जराही विचलित होणार नाही, याची काळजी घेऊ असे आवाहन दर्शन पाल (पंजाब), शिवकुमार कक्काजी (मध्य प्रदेश), जगजीतसिंह दल्लेवाल (पंजाब), गुरनामसिंग चडोनी (हरियाणा), मेधा पाटकर (महाराष्ट्र), योगेंद्र यादव (हरियाणा), रणजीत राजू (राजस्थान), प्रतिभा शिंदे (महाराष्ट्र), अक्षय कुमार (ओडिशा), के. व्ही. बिजू (केरळ), हरपाल चौधरी (उत्तरप्रदेश), कविता कुरुगंते (कर्नाटक) आदींनी केले आहे.

५ डिसेंबरला प्रतिमा दहन!शेतकरी संघटनांनी ५ डिसेंबर रोजी देशभरात सगळ्याच गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या प्रतिमांचे दहन करण्याचा निर्णय घेतला असून, तशा सूचना स्थानिक शेतकरी नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी