शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:28 IST

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करताना एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये फूट कशी पाडता येईल, याचेही डावपेच आखतात हे संतापजनक असून गुरुवारी देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन देण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे. गुरुवारी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले जाईल. शेतीविषयक कायदे मागे घ्या अन्यथा होणाऱ्या उद्रेकास केंद्र सरकार जबाबदार राहील, अशी ताकीद या निवेदनाद्वारे दिली जाणार आहे.  या आंदोलनात ४५० संघटना एकसंघ आहेत. कोणीही दिशाभूल करणार असेल तर त्यांना ‘सरळ’ करा असा इशारा देत आपण जराही विचलित होणार नाही, याची काळजी घेऊ असे आवाहन दर्शन पाल (पंजाब), शिवकुमार कक्काजी (मध्य प्रदेश), जगजीतसिंह दल्लेवाल (पंजाब), गुरनामसिंग चडोनी (हरियाणा), मेधा पाटकर (महाराष्ट्र), योगेंद्र यादव (हरियाणा), रणजीत राजू (राजस्थान), प्रतिभा शिंदे (महाराष्ट्र), अक्षय कुमार (ओडिशा), के. व्ही. बिजू (केरळ), हरपाल चौधरी (उत्तरप्रदेश), कविता कुरुगंते (कर्नाटक) आदींनी केले आहे.

५ डिसेंबरला प्रतिमा दहन!शेतकरी संघटनांनी ५ डिसेंबर रोजी देशभरात सगळ्याच गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या प्रतिमांचे दहन करण्याचा निर्णय घेतला असून, तशा सूचना स्थानिक शेतकरी नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी