शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

२० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 10:48 IST

चिल्ला बॉर्डरवर दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखणं पोलिसांसमोर आव्हान आहे. याठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. शेतकरी आणि अधिकारी यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दीर्घ काळापासून शेतकऱ्यांनी नोएडा येथील सरकारी प्राधिकरणांना घेराव करत आहेत. रविवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बैठक बोलावण्यात आली होती. परंतु मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडा आणि दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहे. दिल्लीच्या सीमेवर सतर्कता बाळगून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक जागांवर बॅरिकेड्स लावले जात आहेत. शेतकरी नेत्यांना नजरकैदेत ठेवले जात आहे. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चिल्ला बॉर्डरवर वाहने खोळंबली आहेत. चिल्ला बॉर्डरवर दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखणं पोलिसांसमोर आव्हान आहे. याठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ पासून अधिग्रहण जमिनीवर ४ पटीने नुकसान भरपाई दिली जावी. गौतमबुद्ध नगरमध्ये १० वर्षापासून सर्किट रेटही बदलला नाही. नव्या जमीन अधिग्रहण कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू करावा. जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात १० टक्के विकसित भूखंड दिला जावा. ६४.७ टक्के दराने नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासात लाभ द्यावा. हाय पॉवर कमिटीच्या शिफारशी लागू करा. 

केव्हापासून सुरू आहे आंदोलन?

नोएडा येथील शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने येणार आहेत. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना अथॉरिटीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. २७ नोव्हेंबरला शेतकऱ्यांनी ग्रेटर नोएडा प्राधिकरणाविरोधात आंदोलन केले. २८ ते १ डिसेंबरपर्यंत यमुना विकास प्राधिकरणाबाहेर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती. रविवारी शेतकरी आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, आंदोलनकारी शेतकरी सर्वात आधी महामाया ब्रीजजवळ दुपारी १२ पर्यंत एकत्रित जमणार आहेत. तिथून दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगड, आगरासह २० जिल्ह्यांतील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागू केला आहे. दिल्लीच्या चहूबाजूने कडेकोड सुरक्षा व्यवस्था आहे. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड्स लावले असून तिथे तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन