शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

२० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 10:48 IST

चिल्ला बॉर्डरवर दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखणं पोलिसांसमोर आव्हान आहे. याठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. शेतकरी आणि अधिकारी यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दीर्घ काळापासून शेतकऱ्यांनी नोएडा येथील सरकारी प्राधिकरणांना घेराव करत आहेत. रविवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बैठक बोलावण्यात आली होती. परंतु मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडा आणि दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहे. दिल्लीच्या सीमेवर सतर्कता बाळगून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक जागांवर बॅरिकेड्स लावले जात आहेत. शेतकरी नेत्यांना नजरकैदेत ठेवले जात आहे. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चिल्ला बॉर्डरवर वाहने खोळंबली आहेत. चिल्ला बॉर्डरवर दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखणं पोलिसांसमोर आव्हान आहे. याठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ पासून अधिग्रहण जमिनीवर ४ पटीने नुकसान भरपाई दिली जावी. गौतमबुद्ध नगरमध्ये १० वर्षापासून सर्किट रेटही बदलला नाही. नव्या जमीन अधिग्रहण कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू करावा. जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात १० टक्के विकसित भूखंड दिला जावा. ६४.७ टक्के दराने नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासात लाभ द्यावा. हाय पॉवर कमिटीच्या शिफारशी लागू करा. 

केव्हापासून सुरू आहे आंदोलन?

नोएडा येथील शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने येणार आहेत. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना अथॉरिटीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. २७ नोव्हेंबरला शेतकऱ्यांनी ग्रेटर नोएडा प्राधिकरणाविरोधात आंदोलन केले. २८ ते १ डिसेंबरपर्यंत यमुना विकास प्राधिकरणाबाहेर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती. रविवारी शेतकरी आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, आंदोलनकारी शेतकरी सर्वात आधी महामाया ब्रीजजवळ दुपारी १२ पर्यंत एकत्रित जमणार आहेत. तिथून दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगड, आगरासह २० जिल्ह्यांतील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागू केला आहे. दिल्लीच्या चहूबाजूने कडेकोड सुरक्षा व्यवस्था आहे. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड्स लावले असून तिथे तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन