शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'टोमॅटो हवे असल्यास...', भारतीय शेतकऱ्यांनी पाकच्या पंतप्रधान इम्रान खान यांना पाठविला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:20 IST

शेतकऱ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ट्विटर आणि पोस्टाद्वारे संदेश पाठविला आहे.

पेटलावद : पाकिस्तानात टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी इराणवरुन 4,500 टन टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला. मात्र इराणी टोमॅटो बाजारात पोहोचले नसल्याने टोमॅटोच्या किंमतीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील पेटलावदच्या 150 हून अधिक शेतकऱ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ट्विटर आणि पोस्टाद्वारे संदेश पाठविला असून यामध्ये पाकव्याप्त काश्मीर द्या आणि आमचे टोमॅटो देऊन जा, असे म्हटले आहे. याशिवाय, 2008मध्ये झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने माफी मागावी, असेही या शेतकऱ्यांनी म्हटले आहे. यासंबंधी ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा शेतकऱ्यांनी केले आहे.      

वाघा बॉर्डरवरून आपल्या देशात टोमॅटो जात होते. मात्र, दहशतवादी आणि आपल्या सैनिकांनी आमच्या देशातील निर्दोष लोकांवर हल्ला केला. दहशतवाद पसरवला. 26/11 आणि पुलवामा यासारखे हल्ले केले. यानंतर आमच्या देशाने आणि आम्ही आपल्याला टोमॅटो निर्यात न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दोन दिवसांत आपल्या देशात टोमॅटोवरून खराब परिस्थिती निर्माण झाल्याचे मीडियाच्या माहितीनुसार समजले. जर, पाकिस्तान भारताच्या शत्रुंना आमच्या सरकारकडे सोपविले आणि पाकव्याप्त काश्मीर शांतिपूर्वक भारताकडे सोपविल्यास भारतीय शेतकरी युनियन टोमॅटो पाठवण्यासंदर्भात विचार करेल, असे ट्विटरच्या माध्यमातून भारतीय शेतकरी युनियनच्या झाबुआ जिल्हा संघटनेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सांगितले आहे. 

दरम्यान, पाकिस्तानमधील टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी इराणवरुन 4,500 टन टोमॅटो आयात करण्याचा परवाना जारी केला आहे. मात्र इराणी टोमॅटो बाजारात पोहोचले नसल्याने टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही दिवसांपासून टोमॅटो 300 रुपये प्रति किलो विकला जात होता. पण आता या किंमतीत वाढ होऊन 400 रुपये झाल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानFarmerशेतकरी