शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:44 IST

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर सरकार १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, असे खुद्द मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले. यातच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शनिवारी तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, ‘तेलंगणातील शेतरी कुटुंबांना शुभेच्छा. काँग्रेस सरकारने आपले 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून शेतकरी न्यायाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. यामुळे 40 लाखहून अधिक शेतकरी कुटुंब कर्ज मुक्त होतील. जे बोललो, करून दाखवलं, हीच नियत आहे आणि सवयही.’

47 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा - राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेस सरकारचा अर्थ, राज्याच्या तिजोरीतील पैसा शेतकरी, मजूर आणि वंचित समाजाला मजबूत करण्यासाठी खर्च होईल, याची हमी. तेलंगणा सरकारचा हा निर्णय त्याचे उदाहरण आहे. आमचे आश्वासन आहे की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे-तिथे भारताचा पैसा भारतीयांवर खर्च करेल, भांडवलदारांवर नाही."

तेलंगणा सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील जवळपास 47 लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची रूपरेषा लवकरच अधिसूचित केली जाईल. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने तेलंगणातील जनतेला आश्वासन दिले होते की, राज्यात आपले सरकार आल्यास आपण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. काँग्रेसला या आश्वासनाचा मोठा फायदा झाल्याचेही बोलले जाते. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही कर्जमाफी योजना १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी