शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी शेतकऱ्यांचे राष्‍ट्रपतींना पत्र, केंद्रावर केले गंभी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:15 IST

Lakhimpur Kheri Violence:संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

लखीमपूर:उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्याच्या मुलामध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या हिंसक घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे विरोधी पक्ष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या प्रकरणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करणे, तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकावे असेही या पत्रात म्हटले आहे.

'उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचे षड्यंत्र'

संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप करण्यात आले आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना तुडवून ठार मारण्याची घटना निंदनीय आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनींच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या मुलाने क्रुरपणे हल्ला केला. हा केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा मोठा कट आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

यूपी सरकारने पंजाबला पत्र लिहिलेदरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून राज्याला विनंती केली की कोणालाही लखीमपूर खीरीला जाऊ देऊ नका. काल लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या शेजारील राज्यांच्या सीमेवर सखोल तपासणी मोहीम राबवली जात आहे. अशा स्थितीत, डीएनडी टोल प्लाझावर दिल्लीच्या बाजूने यूपीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांना तपासणी केल्यानंतरच यूपी सीमेत प्रवेश दिला जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlakhimpur-pcलखीमपुरFarmers Protestशेतकरी आंदोलनRamnath Kovindरामनाथ कोविंद