शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी शेतकऱ्यांचे राष्‍ट्रपतींना पत्र, केंद्रावर केले गंभी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:15 IST

Lakhimpur Kheri Violence:संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

लखीमपूर:उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्याच्या मुलामध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या हिंसक घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे विरोधी पक्ष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या प्रकरणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करणे, तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकावे असेही या पत्रात म्हटले आहे.

'उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचे षड्यंत्र'

संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप करण्यात आले आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना तुडवून ठार मारण्याची घटना निंदनीय आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनींच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या मुलाने क्रुरपणे हल्ला केला. हा केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा मोठा कट आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

यूपी सरकारने पंजाबला पत्र लिहिलेदरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून राज्याला विनंती केली की कोणालाही लखीमपूर खीरीला जाऊ देऊ नका. काल लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या शेजारील राज्यांच्या सीमेवर सखोल तपासणी मोहीम राबवली जात आहे. अशा स्थितीत, डीएनडी टोल प्लाझावर दिल्लीच्या बाजूने यूपीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांना तपासणी केल्यानंतरच यूपी सीमेत प्रवेश दिला जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlakhimpur-pcलखीमपुरFarmers Protestशेतकरी आंदोलनRamnath Kovindरामनाथ कोविंद