शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी शेतकऱ्यांचे राष्‍ट्रपतींना पत्र, केंद्रावर केले गंभी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:15 IST

Lakhimpur Kheri Violence:संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

लखीमपूर:उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्याच्या मुलामध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या हिंसक घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे विरोधी पक्ष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या प्रकरणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करणे, तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकावे असेही या पत्रात म्हटले आहे.

'उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचे षड्यंत्र'

संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप करण्यात आले आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना तुडवून ठार मारण्याची घटना निंदनीय आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनींच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या मुलाने क्रुरपणे हल्ला केला. हा केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा मोठा कट आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

यूपी सरकारने पंजाबला पत्र लिहिलेदरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून राज्याला विनंती केली की कोणालाही लखीमपूर खीरीला जाऊ देऊ नका. काल लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या शेजारील राज्यांच्या सीमेवर सखोल तपासणी मोहीम राबवली जात आहे. अशा स्थितीत, डीएनडी टोल प्लाझावर दिल्लीच्या बाजूने यूपीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांना तपासणी केल्यानंतरच यूपी सीमेत प्रवेश दिला जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlakhimpur-pcलखीमपुरFarmers Protestशेतकरी आंदोलनRamnath Kovindरामनाथ कोविंद