शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही -सोनिया

By admin | Updated: March 28, 2015 00:02 IST

दूरदृष्टीचा अभाव असलेल्या मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उद्योगपतींना लाभ मिळवून देण्यासाठी लोटांगण घातले आहे,

नवी दिल्ली : दूरदृष्टीचा अभाव असलेल्या मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उद्योगपतींना लाभ मिळवून देण्यासाठी लोटांगण घातले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. संकुचित राजकारण न करता २०१३ चा पुरोगामी आघाडी सरकारने आणलेला भूसंपादन कायदा जशाच्या तसा परत आणावा, असे आवाहन करीत शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड होणे नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.या भूमिकेचा पुनरूच्चार त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात केला. शेतकरी म्हणजे देशाचा कणा आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांचे हित जोपासले गेलेच पाहिजे. या मुद्यावर काँग्रेस कुठलीही तडजोड करणार नाही आणि या देशाचा कणा मोडणाऱ्या कायद्याचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही, असेही गांधी यांनी या पत्रात स्पष्टपणे अधोरेखित केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)आपण कुठलाही विचारविनिमय अथवा चर्चा न करता भूसंपादन कायद्यात दुरुस्ती केली आहे. मनमानीपणे शेतकरीविरोधी कायदा थोपविल्यानंतर आता चर्चेचा फार्स उभा करणे म्हणजे राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे धोरण लागू करण्यापूर्वी सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये सर्वसहमती बनविण्याच्या परंपरेची अवहेलना करण्यासारखे आहे. -सोनिया गांधी,काँग्रेस अध्यक्ष 1 संपुआने २०१३ मध्ये आणलेल्या भूसंपादन विधेयकात सामाजिक परिणामांचा आढावा सहा महिन्यात घेणे बंधनकारक केले होते. रालोआ सरकारने ही अटच रद्द केली. त्याचे कारण काय? हे शेतकऱ्यांचे हिताचे कसे ठरणार? 2 २०१३ च्या कायद्यानुसार खासगी कंपन्यांसाठी जमीन संपादित करताना ८० टक्के तर सार्वजनिक -खासगी सहभगातील प्रकल्पांसाठी ७० टक्के शेतकऱ्यांची परवानगी अनिवार्य केली होती. रालोआने केवळ काही महत्त्वपूर्ण नसलेल्या प्रकरणांचे अपवाद वगळता ही गरज अनावश्यक ठरविली आहे.3 औद्योगिक कॉरिडॉरसाठीच जागा घेणार असे आधीच्या भूसंपादन कायद्यात नमूद होते. आता औद्योगिक कॉरिडॉरसह त्याच्या दुतर्फा एक कि.मी. जमीन अतिरिक्त घेण्याची मुभा आहे. 4 संपुआने आणलेल्या कायद्यात १८९४ च्या कायद्यानुसार ज्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या त्यांना वाढीव नुकसानभरपाई दिली जाणार होती. नवी अट घालत या सरकारने लाखो शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले.5 मोदी सरकारने २०१३ च्या कायद्यातच सुधारणा करण्याच्या बहाण्याने हा संपूर्ण कायदाच निष्प्रभ केला असून यामुळे देशभरातील शेतकरी नाराज झाले आहेत.6 संरक्षण, सिंचन आणि ऊर्जेच्या मुद्यावर मोदी सरकारकडून दिली जाणारी आश्वासने म्हणजे मुळात भूसंपादन कायद्यातील शेतकरीविरोधी दुरुस्त्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. ेशाला आपली सिंचन क्षमता वाढवायची आहे. जास्तीतजास्त स्वदेशी संरक्षण उपकरणांचे उत्पादन करायचे आहे. तसेच ग्रामीण पायाभूत संरचनेत सुधारणा करण्याचीही गरज आहे याबाबत दुमत नाही. परंतु या सर्व उपलब्धी शेतकऱ्याला देशोधडीला लावून त्याची उपजीविका हिसकावून प्राप्त करता येणार नाहीत. सोनिया देश-परदेश जोड२०१३ च्या कायद्यातही ग्रामीण पायाभूत संरचना आणि संरक्षण उद्योग वाढीच्या दृष्टीने या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हिताला तडा न देता.२०१३ चा कायदा राष्ट्रीय सुरक्षा, सिंचन आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीतील अडथळा असल्याचा दावा पूर्णत: निराधार आणि अमान्य आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे याचा अर्थ विकासाला विरोध आहे असा होत नाही.भूसंपादन कायदा हा केवळ काँग्रेसने आणलेला कायदा नसून भाजपसह विरोधी पक्षांनीही त्यात योगदान दिले आहे. सर्वंकष विचारविनिमय आणि सर्वसहमतीनेच तो तयार करण्यात आला होता.