चिंचवडेत शेतमजुराची आत्महत्या
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:56+5:302014-12-20T22:27:56+5:30
कोपार्डे : चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील पांडुरंग दत्तू कांबळे (वय ४०) यांनी आज, शनिवारी आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी शेजारच्या शेतातील शेतकरी तेथे गेले असता ही घटना उघड झाली.

चिंचवडेत शेतमजुराची आत्महत्या
क पार्डे : चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील पांडुरंग दत्तू कांबळे (वय ४०) यांनी आज, शनिवारी आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी शेजारच्या शेतातील शेतकरी तेथे गेले असता ही घटना उघड झाली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पांडुरंग कांबळे शेतमजूर होते. शुक्रवारी रात्री दहा वाजता त्यांनी घरीच जेवण घेतले व पत्नीला न सांगता घरातून बाहेर पडले. रात्री घरी न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली. मात्र, ते सापडला नाहीत. कोल्हापूर-गगनबावड्याच्या उत्तरेला मरळी व चिंचवडे गावच्या दरम्यान असणार्या कागद कारखान्याच्या शेजारीच गोंधळ्याचे वावर नावाने हरिजनांची सामुदायिक शेती आहे. या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन पांडुरंग यांनी आपली जीवनयात्रा संपवली. शेतमजुरी करून कुटुंबाचे पोट भरणारा एकमेव आधारच नाहीसा झाल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)---------------------पांडुरंग कांबळे यांचा फोटो मेलवरुन पाठविला आहे.-------------