शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

शेतकऱ्यांचा २९ नोव्हेंबरला संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, आंदोलन कायमच; मागण्या प्रलंबित असल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 04:11 IST

आमच्या आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी ठरविलेले कार्यक्रम राबविले जातील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली.

विकास झाडे -नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केल्यानंतरही आमचे ओदोलन सुरूच राहील, कारण आमच्या अनेक मागण्या केंद्र सरकारने अद्याप मान्य केलेल्याच नाहीत. त्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी आमचा आग्रह कायम आहे. असे किसान मोर्चातर्फे शनिवारी जाहीर करण्यात आले.

आमच्या आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी ठरविलेले कार्यक्रम राबविले जातील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली.

आंदोलनाची पुढील रणनीती काय असेल? याबाबत मोर्चाच्या कोअर कमिटीची पुन्हा रविवारी बैठक होणार असल्याचे डॉ. दर्शन पाल यांनी सांगितले, मात्र हिवाळी अधिवेशनात संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमचे २२, २६ आणि २९ नोव्हेंबरचे कार्यक्रम पूर्वीसारखेच असतील. तसेच २२ नोव्हेंबर रोजी लखनौला सभा होणार आहे. आंदोलनाला २६ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत असताना देशभरात ते साजरे केले जाणार आहे. तसेच २९ नोव्हेंबरच्या संसदेपर्यंत ट्रॅक्टर मोर्चाची तयारी जोरात सुरू आहे.- डॉ. दर्शन पाल, संयुक्त किसान मोर्चाचे नेते

या आहेत प्रमुख मागण्या - कृषी कायद्यांव्यतिरिक्त कृषी मालाला किमान हमी भाव म्हणजेच एमएसपी मिळायला हवा. त्यासाठी वेगळा कायदा करावा, अशी मागणी कायम आहे. याखेरीज या आंदोलनात शेतकऱ्यांवर घालण्यात आलेले सर्व खटले मागे घ्यावेत. वीज बिल मागे घ्यावे, वायु गुणवत्ता वटहुकूम आणावा, असे आमचा आग्रह असल्याचे डॉ. पाल यांनी स्पष्ट केले.

स्मारकासाठी जागा द्या -- या आंदोलनाच्या काळात आमचे अनेक सहकारी मरण पावले. त्यांचे स्मारक बांधण्यात यावे, असे किसान मोर्चाचे म्हणणे आहे. 

- ते स्मारक आम्हीच बांधू, पण त्यासाठी सरकारने जागा द्यावी, आमच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने लवकर बैठक बोलवावी, अशी मागणीही किसान मोर्चाने केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनParliamentसंसदdelhiदिल्ली