शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 13:57 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे.

ठळक मुद्देया शेतकऱ्याने दिल्ली सीमेवरील गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी तयार करण्यात आलेल्या एका शौचालयात फाशी घेऊन आत्महत्या केली. गेल्या 38 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे.

गाझियाबाद - केंद्र सरकारने नुकतेच तीन नवे कृषी विषयक कायदे लागू केले आहेत. हे तीनही कायदे शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत, सरकारने ते तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीला घेऊन गेल्या 38 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरू असतानाच शनिवारी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या शेतकऱ्याने दिल्ली सीमेवरील गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी तयार करण्यात आलेल्या एका शौचालयात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले - आत्महत्याग्रस्त शेतकरी काश्मीर सिंग यांची सुसाईड नोट आढळून आली आहे. यात त्यांनी लिहिले आहे, की त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. तसेच आपल्यावर दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सीमेवरच अंत्यसंस्कार करण्यात यावेत.

हृदयविकाराच्या झटक्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू - तत्पूर्वी गाझीपूर सीमेवर शुक्रवारी एका शेतकऱ्याची हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मोहन सिंग (57) असे या शेतकऱ्याचे नाव होते. ते बागपत जिल्ह्यातील गवानपूरमधील नांगल गावचे रहिवासी होते. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सोमवारी चर्चेची पुढची फेरी -आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली-हरयाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवर बैठक घेतली. शेतकरी आणि सरकारमध्ये सोमवारी 4 जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे. बुधवारी ३० डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले. परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघू शकला नाही. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपfarmer suicideशेतकरी आत्महत्याdelhiदिल्लीHaryanaहरयाणा