शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

Farmer's Agitation: चर्चा निष्फळ, कायदे मागे घेण्यावर सर्व संघटना ठाम; शेतकरी रॅली काढणारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:46 IST

नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. 

विकास झाडे -नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे सर्वोत्तम आहेत. तरीही आम्ही ते काही काळ स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता यापेक्षा आम्ही अधिक काहीही करू शकत नाही, असे सांगत मंत्रीगटाने शेतकरी नेत्यांसोबतची बैठक आवरती घेतली. नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. आंदाेलकांची जोरदार तयारी - आंदोलनाला ५८ दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारचा निषेध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या रिंंगरोडवर ट्रॅक्टर रॅली काढण्याचे शेतकऱ्यांनी निश्चित केले आहे. शेतकऱ्यांची यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीला जाता यावे यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. ठिकठिकाणी रॅलीची रंगीत तालीमही सुरु आहे.प्रसारमाध्यमांकडे गेल्याने शेतकरी नेत्यांना सुनावले -शुक्रवारी विज्ञान भवनात शेतकरी नेते आणि मंत्रीगटासोबत अकरावी बैठक होती. दहाव्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना दिलेला कायदे स्थगितीचा प्रस्ताव फेटाळल्याने अस्वस्थ झालेले कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, सरकार कायदे रद्द करणार नाही. कायद्या सुधारणा हव्या तर सुचवा, ते दीड ते दोन वर्षांसाठी स्थगित करायचे असेल तर बोला. तुम्ही आतापर्यंत सहकार्य केल्याबाबत आभारी आहोत. आम्ही सन्मान म्हणून स्थगितीचा प्रस्ताव दिला परंतु तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. या प्रस्तावाबाबत तुम्ही मीडियाकडे न जाता आमच्याशी बोलू शकले असते, असेही तोमर यानी नेत्यांना सुनावले.पुढच्या बैठकीची तारीख ठरली नाही -केंद्रानेही आता कठोर भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांकडून जोपर्यंत सरकारकडे कोणताही प्रस्ताव जात नाही तोपर्यंत पुढची बैठक होणार नाही. तोमर यांनी तूर्तास कोणतीही बैठक नसल्याचे बैठकीनंतर सांगितले. आजच्या मंत्रीगटामध्ये वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री सोमप्रकाश यांचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ २० मिनिटे आजची अधिकृत बैठक चालली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली