शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू; दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 07:07 IST

दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांची चर्चा; शेतकरी-सरकारमध्ये ४ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी संघटना दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करीत आहेत. दिल्लीत सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीत ३७ व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली-हरयाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवर येथे बैठक घेतली. शेतकरी आणि सरकारमध्ये सोमवारी ४ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे.

बुधवारी ३० डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले. परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

शेतकरी या दोन्ही मागण्यांवर ठाम आहेत. या चर्चेत केंद्र सरकारचे दोन मंत्री आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी हजर होते. या आधी दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या सहा फेऱ्या पार पडल्या परंतु त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. ९ डिसेंबर रोजी चर्चेची सहावी फेरी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने थांबवण्यात आली होती.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंघू, गाझीपूर, टिकरी आदी प्रवेशद्वारांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. राजधानीत ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी पऱ्यायी मार्ग निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी राजस्थानातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी राजस्थान-हरयाणा सीमेवर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवरून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर तसेच पाण्याचा मारा  केला.

कडाक्याच्या थंडीत एका शेतकऱ्याच्या मृत्यू

कडाक्याच्या थंडीत दिल्ली-उत्तर प्रदेश दरम्यान असलेल्या गाझीपूर बॉर्डरवर चौधरी गलतान सिंह (वय ५७) हे शेतकरी मृत्युमुखी पडले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत या जिल्ह्यातील होते. नोव्हेंबरपासून ते या आंदोलनात सहभागी होते. आतापर्यंत ४० हून अधिक जणांचा या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. काही जणांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आत्महत्या केल्या आहेत. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीBJPभाजपा