शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू; दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 07:07 IST

दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांची चर्चा; शेतकरी-सरकारमध्ये ४ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी संघटना दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करीत आहेत. दिल्लीत सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीत ३७ व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली-हरयाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवर येथे बैठक घेतली. शेतकरी आणि सरकारमध्ये सोमवारी ४ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे.

बुधवारी ३० डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले. परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

शेतकरी या दोन्ही मागण्यांवर ठाम आहेत. या चर्चेत केंद्र सरकारचे दोन मंत्री आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी हजर होते. या आधी दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या सहा फेऱ्या पार पडल्या परंतु त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. ९ डिसेंबर रोजी चर्चेची सहावी फेरी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने थांबवण्यात आली होती.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंघू, गाझीपूर, टिकरी आदी प्रवेशद्वारांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. राजधानीत ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी पऱ्यायी मार्ग निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी राजस्थानातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी राजस्थान-हरयाणा सीमेवर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवरून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर तसेच पाण्याचा मारा  केला.

कडाक्याच्या थंडीत एका शेतकऱ्याच्या मृत्यू

कडाक्याच्या थंडीत दिल्ली-उत्तर प्रदेश दरम्यान असलेल्या गाझीपूर बॉर्डरवर चौधरी गलतान सिंह (वय ५७) हे शेतकरी मृत्युमुखी पडले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत या जिल्ह्यातील होते. नोव्हेंबरपासून ते या आंदोलनात सहभागी होते. आतापर्यंत ४० हून अधिक जणांचा या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. काही जणांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आत्महत्या केल्या आहेत. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीBJPभाजपा