शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू; दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 07:07 IST

दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांची चर्चा; शेतकरी-सरकारमध्ये ४ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी संघटना दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करीत आहेत. दिल्लीत सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीत ३७ व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली-हरयाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवर येथे बैठक घेतली. शेतकरी आणि सरकारमध्ये सोमवारी ४ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे.

बुधवारी ३० डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले. परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

शेतकरी या दोन्ही मागण्यांवर ठाम आहेत. या चर्चेत केंद्र सरकारचे दोन मंत्री आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी हजर होते. या आधी दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या सहा फेऱ्या पार पडल्या परंतु त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. ९ डिसेंबर रोजी चर्चेची सहावी फेरी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने थांबवण्यात आली होती.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंघू, गाझीपूर, टिकरी आदी प्रवेशद्वारांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. राजधानीत ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी पऱ्यायी मार्ग निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी राजस्थानातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी राजस्थान-हरयाणा सीमेवर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवरून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर तसेच पाण्याचा मारा  केला.

कडाक्याच्या थंडीत एका शेतकऱ्याच्या मृत्यू

कडाक्याच्या थंडीत दिल्ली-उत्तर प्रदेश दरम्यान असलेल्या गाझीपूर बॉर्डरवर चौधरी गलतान सिंह (वय ५७) हे शेतकरी मृत्युमुखी पडले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत या जिल्ह्यातील होते. नोव्हेंबरपासून ते या आंदोलनात सहभागी होते. आतापर्यंत ४० हून अधिक जणांचा या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. काही जणांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आत्महत्या केल्या आहेत. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीBJPभाजपा