शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काही अदृश्य शक्तींना शेतकरी आंदोलनात तोडगा निघू नये असं वाटतंय; कृषी मंत्र्यांचा निशाणा कोणावर?

By कुणाल गवाणकर | Updated: January 24, 2021 16:23 IST

सरकारनं शेतकऱ्यांना अनेक प्रस्ताव दिले; पण शेतकऱ्यांनी एकही प्रस्ताव दिला नाही- नरेंद्र तोमर

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टर मोर्चाची तयारी सुरू केली आहे. २६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. यानंतर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं आहे. हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.शेतकरी संघटना केवळ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतात. ते कायद्यांच्या फायद्यांबद्दल बोलतच नाहीत, असं म्हणत तोमर यांनी दु:ख व्यक्त केलं. शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असा दावा त्यांनी केला. या अदृश्य शक्ती कोण आहेत, याबद्दल विचारलं असता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे फायदे जाणूनच घेण्याची इच्छाच नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरल्या, असं तोमर यांनी म्हटलं.शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही संवेदनशीलपणे हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं तोमर यांनी सांगितलं. 'शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर आंदोलन सुरू केल्यापासूनच आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. या विषयात तोडगा निघावे यासाठी आमच्याकडून अनेकदा प्रयत्न केले गेले,' असं तोमर म्हणाले.आम्ही आंदोलक शेतकऱ्यांना बैठकांच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिले. शुक्रवारी आमची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. त्याआधीच आम्ही त्यांना सरकार दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. याबद्दलचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला. मात्र तो त्यांनी अमान्य केला. तुम्ही सरकारला प्रस्ताव द्या, असं आवाहन सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं. मात्र शेतकऱ्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही, याकडे तोमर यांनी लक्ष वेधलं. 

टॅग्स :Farmerशेतकरी