शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

काही अदृश्य शक्तींना शेतकरी आंदोलनात तोडगा निघू नये असं वाटतंय; कृषी मंत्र्यांचा निशाणा कोणावर?

By कुणाल गवाणकर | Updated: January 24, 2021 16:23 IST

सरकारनं शेतकऱ्यांना अनेक प्रस्ताव दिले; पण शेतकऱ्यांनी एकही प्रस्ताव दिला नाही- नरेंद्र तोमर

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टर मोर्चाची तयारी सुरू केली आहे. २६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. यानंतर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं आहे. हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.शेतकरी संघटना केवळ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतात. ते कायद्यांच्या फायद्यांबद्दल बोलतच नाहीत, असं म्हणत तोमर यांनी दु:ख व्यक्त केलं. शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असा दावा त्यांनी केला. या अदृश्य शक्ती कोण आहेत, याबद्दल विचारलं असता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे फायदे जाणूनच घेण्याची इच्छाच नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरल्या, असं तोमर यांनी म्हटलं.शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही संवेदनशीलपणे हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं तोमर यांनी सांगितलं. 'शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर आंदोलन सुरू केल्यापासूनच आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. या विषयात तोडगा निघावे यासाठी आमच्याकडून अनेकदा प्रयत्न केले गेले,' असं तोमर म्हणाले.आम्ही आंदोलक शेतकऱ्यांना बैठकांच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिले. शुक्रवारी आमची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. त्याआधीच आम्ही त्यांना सरकार दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. याबद्दलचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला. मात्र तो त्यांनी अमान्य केला. तुम्ही सरकारला प्रस्ताव द्या, असं आवाहन सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं. मात्र शेतकऱ्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही, याकडे तोमर यांनी लक्ष वेधलं. 

टॅग्स :Farmerशेतकरी