शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी Reliance Jio चे समजून जे टॉवर फोडले, ते मुकेश अंबानींनी कधीचेच विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 17:18 IST

Farmer Protest, Reliance Jio : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पंजाबमध्ये दिसून येत आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या विविध भागांमध्ये Reliance Jio च्या सुमारे 1500 टॉवर्सना लक्ष्य  केले. धक्कादायक बाब म्हणजे हे काही महिन्यांपूर्वी रिलायन्सच्या मालकीचे टॉवर होते, परंतू ते मुकेश अंबानी यांनी कॅनडाच्या कंपनीला विकले आहेत. 

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. नव्या कृषी कायद्यांचा सर्वाधिक फायदा उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या कंपन्यांच्या साधनसंपत्तीला लक्ष्य करण्यात येत आहे. पंजाबमध्ये जिओचे ९ हजार मोबाइल टॉवर आहेत. त्यापैकी अनेक टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. एका ठिकाणी काही लोकांनी मोबाइल टॉवरसाठी लावण्यात आलेला जनरेटर पळवला. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत ४३३ मोबाइल टॉवरची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्याने परिस्थिती चिघळली आहे.

जिओचे हे टॉवर अंबानी य़ांनी कॅनडाच्या ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्टर पार्टनर्स एलपी कंपनीला विकले आहेत. अंबानी यांनीच याची घोषणा सप्टेंबरमध्ये केली होती. याद्वारे अंबानींना 25,215 कोटी रुपये मिळाले आहेत. या पैशांतून रिलायन्स जिओ इंफ्राटेलचे कर्ज चुकते करणार आहे. म्हणजेच शेतकरी जे टॉवर अंबानींचे आहेत असे समजून तोडत आहेत ते कधीच ब्रुकफिल्डच्या मालकीचे झाले आहेत. 

हे टॉवर आता रिलायन्सचे नसले तरीही त्यावर जिओची यंत्रणा लागलेली आहे. यामुळे हे टॉवर बंद केले किंवा मोडतोड केली तर रिलायन्सच्या नेटवर्कला नुकसान होत आहे. बिना टॉवरचे नेटवर्क काम करणार नाही, यामुळे जिओच्या महसुलावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. रिलायन्स जिओ आधी पैसे घेते मग सेवा देतेय, यामुळे अनेकांनी रिचार्ज आधीच मारलेली आहेत. ज्य़ांची रिचार्ज संपत आली आहेत, त्यांना ही रिचार्ज मारता न आल्याने किंवा रेंजच नसल्याने ते ही रिचार्ज पुढे मारण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीReliance Jioरिलायन्स जिओFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीPunjabपंजाब