शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मोदी सरकार, हट्ट सोडा! आगीशी खेळ करू नका; आंदोलक शेतकऱ्यांचा मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 19:41 IST

Farmer Protest : शेतकरी नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावावर आज सिंघु सीमेवर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. गेले 28 दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर घेराव घालून बसलेले आहेत. सुरुवातीला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने देशभरातील विरोध आणि तीव्रता पाहून चर्चेचे दरवाजे सुरु केले खरे मात्र शेतकऱ्यांनी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

केंद्रातील मोदी सरकारेने तीन महिन्यांपूर्वी आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता महिना होणार आहे. गेले 28 दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर घेराव घालून बसलेले आहेत. सुरुवातीला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने देशभरातील विरोध आणि तीव्रता पाहून चर्चेचे दरवाजे सुरु केले खरे मात्र शेतकऱ्यांनी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. मोदी सरकार, हट्ट सोडा! आगीशी खेळ करू नका, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. 

शेतकरी नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावावर आज सिंघु सीमेवर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अन्य राज्यांमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. ते एवढे ताकदीचे नाहीय. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यास सांगितले जाणार आहे. याचबरोबर सरकारकडे गुप्तहेर आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. एवढेच नाही तर राजस्थान, गुजरातहून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलकांना येऊन मिळाले आहेत, असे या नेत्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या पत्राला उत्तर देताना स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी सांगितले की, आंदोलक शेतकरी हे संकटग्रस्त नसून ते राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, अशी वागणूक मोदी सरकार देत आहे. सरकारचे हे वागणे शेतकऱ्यांना आंदोलन आणखी तीव्र करायला भाग पाडत आहे. सरकार तथाकथित शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करत आहे, त्यांच्या आमच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाहीय. आमचे आंदोलन संपविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. 

भारतीय किसान युनियनचे युद्धवीर सिंह यांनी सांगितले की, ज्या प्रकारे केंद्र ही चर्चा पुढे नेत आहे, त्यावरून हे स्पष्ट होतेय की सरकार मुद्दामहून विलंब करू पाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल तुटेल असा प्रयत्न आहे. सरकार आमचे मुद्दे हलक्यात घेत आहे. लवकरात लवकर या प्रकरणावर तोडगा काढावा हा आमचा इशारा आहे. सरकारने आगीशी खेळू नये आणि हट्ट सोडून आमची कायदे रद्द करण्याची मागणी ऐकावी.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी